शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

कोल्हापूर : अनुदान दिले तरच एकरकमी एफआरपी, साखर कारखानदारांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 11:31 AM

राज्य व केंद्र सरकारने प्रतिटन ५०० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करावे अथवा साखरेचा किमान दर २९०० रुपयांवरून ३४०० रुपये करावा, अशी मागणी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पत्रकार परिषदेत केली. या मागणीचे निवेदन त्यांनी प्रादेशिक साखर उपसंचालक दत्तात्रय खांडेकर यांना दिले.

ठळक मुद्देअनुदान दिले तरच एकरकमी एफआरपी, साखर कारखानदारांची भूमिकासरकारने प्रतिटन ५०० रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे

कोल्हापूर : साखरेचा दर, त्यावर मिळणारी उचल, उपपदार्थांपासून मिळणारे पैसे, खर्च आणि ‘एफआरपी’ याची सांगड बसत नसल्याने सरकारच्या मदतीशिवाय एकरकमी एफआरपी देणेच शक्य नाही. यासाठी राज्य व केंद्र सरकारने प्रतिटन ५०० रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करावे अथवा साखरेचा किमान दर २९०० रुपयांवरून ३४०० रुपये करावा, अशी मागणी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी पत्रकार परिषदेत केली. या मागणीचे निवेदन त्यांनी प्रादेशिक साखर उपसंचालक दत्तात्रय खांडेकर यांना दिले.एकरकमी एफआरपीवरून निर्माण झालेल्या पेचाबाबत जिल्ह्यातील साखर कारखानदारांची शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ‘जवाहर’चे अध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले, सध्या देशातंर्गत बाजारपेठेत साखर २९०० रुपये क्विंटलने विक्री होते, त्याचाही उठाव होत नाही. बॅँकांकडून मिळणाऱ्या उचलीतून एकरकमी एफआरपी देऊ शकत नाही. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील व ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली.

मंत्री पाटील यांनी प्रश्न गंभीर आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. शेट्टी हे मात्र एकरकमी एफआरपीवर ठाम आहेत. आता यातून सरकारच मार्ग काढू शकते, साखरेचा किमान भाव २९०० वरून ३४०० रुपये करा, अन्यथा देय एफआरपी व बॅँकांची उचल यातील दुराव्याची रक्कम प्रतिटन ५०० रुपये सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे. अनेक राज्यांत अशा प्रकारची मदत दिलेली आहे.केंद्राने निर्यातीसारखे निर्णय चांगले घेतले, पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरासरी प्रतिक्विंटल २००० रुपये आहे; पण बॅँकांनी ३१०० रुपये मूल्यांकन करून ८५ टक्के उचल दिली आहे. यामध्ये १००० ते ११०० रुपये दुरावा आहे. सरकारने हा दुरावा ठेवून बॅँकेस साखर निर्यात करण्यास परवानगी देण्यास सांगावे. सरकारने गांभीर्याने मार्ग काढावा, अशी मागणी आवाडे यांनी केली.त्यानंतर शिष्टमंडळाने प्रादेशिक उपसंचालक दत्तात्रय खांडेकर यांना निवेदन दिले. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, आमदार चंद्रदीप नरके, गणपतराव पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, हरीष चौगले, अशोक चराटी, पी. जी. मेढे, के. पी. सिंग, आदी उपस्थित होते.

आठ लाख टनांची निर्यातराज्यातील साखर कारखान्यांना दिलेल्या कोट्यानुसार ३२ लाख टन साखर निर्यात होणे अपेक्षित होते; पण आतापर्यंत केवळ आठ लाख टन निर्यात झाली असून, येथून निर्यात होण्याची शक्यताही धूसर आहे. त्यात यंदाही साखरेचे उत्पादन जादाच होणार असल्याने उद्योग अरिष्टात सापडणार हे निश्चित असल्याचे आवाडे यांनी सांगितले.

गडकरी यांच्या वक्तव्याची चिंतागेल्या वर्षी साखर कारखाना काढला आणि उद्योग अडचणीत आला, साखर समुद्रात फेकून द्यावी की काय, अशी परिस्थिती झाल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याची चिंता वाढते; पण येथील शेतकरी उसाशिवाय दुसरे पीक घेऊ शकत नसल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

पक्यापेक्षा कच्चा मालाची किंमत जास्त कशीकच्च्या (ऊस) मालाची किंमत पक्क्या (साखर) मालापेक्षा जास्त असणारा साखर उद्योग एकमेव आहे. एफआरपी ठरविताना गृहीत धरलेला ३५०० रुपये साखरेचा दर स्थिर ठेवणे सरकारला बंधनकारक आहे. तो ठेवता येत नसेल तर त्यातील दुरावा अनुदान स्वरूपात द्यावा, अशी मागणी चंद्रदीप नरके यांनी केली.

कर्ज नको अनुदानच द्यामागील दोन-तीन हंगामात एफआरपीसाठी सरकारने कारखानदारांना कर्जे दिली. त्याची परतफेड करत एफआरपी देताना दमछाक उडत आहे. त्यामुळे आता कर्ज नको अनुदानच द्यावे, अशी मागणी प्रकाश आवाडे यांनी केली. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर