शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

कोल्हापूर : सायरन वाजताच चोरट्यांचे पलायन, भरदिवसा बँक फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 2:24 PM

गणेशवाडी (ता. करवीर) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे शर्टर भरदिवसा उचकटून आतमध्ये प्रवेश करताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. ही घटना घडून नऊ दिवस झाल्यानंतर सोमवारी (दि. ३०) करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे औदार्य दाखविले आहे.

ठळक मुद्दे सायरन वाजताच चोरट्यांचे पलायन, नागरिकांत भीतीचे वातावरण गणेशवाडीतील राष्ट्रीयीकृत बँक भरदिवसा फोडण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : गणेशवाडी (ता. करवीर) येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेचे शर्टर भरदिवसा उचकटून आतमध्ये प्रवेश करताच सायरन वाजल्याने चोरट्यांनी पलायन केले. ही घटना घडून नऊ दिवस झाल्यानंतर सोमवारी (दि. ३०) करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे औदार्य दाखविले आहे. बँक फोडण्याचा प्रयत्न होऊनही पोलिसांकडून अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर नागरिकांत भीती पसरली आहे.अधिक माहिती अशी, गणेशवाडी येथील प्रताप चंद्रकांत पाटील यांच्या गाळ्यामध्ये गेल्या पाच वर्षांपासून एका राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. शाखाधिकारी सुरेश अशोक देसाई (वय ४४, रा. मिणचे सावर्डे, ता. हातकणंगले) हे शनिवारी, २१ जुलैला चार वाजता बँक बंद करून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी रविवारी २२ जुलैला दुपारी दोनच्या सुमारास अचानक बँकेचा सायरन वाजला. तो एकसारखा वाजू लागल्याने शेजारील लोकांनी बँकेचा शिपाई एकनाथ माने (रा. गणेशवाडी) यांना फोनवरून माहिती दिली. माने तत्काळ बँकेत आले असता बँकेचे शटर उचकटलेले होते. आतमध्ये लोखंडी पहार पडली होती.

चोरीचा संशय आल्याने त्यांनी व्यवस्थापक सुरेश देसाई यांना बोलावून घेतले. देसाई यांनी बँकेत येऊन पाहणी केली असता बँकेच्या मागील बाजूच्या खिडकीचे गज वाकविलेले दिसले. तेथून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न असफल झाल्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून आत जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र बँक बंद असताना शटर उघडल्यानंतर आतमध्ये कोणीही गेले असता सायरन वाजतो. नेमका त्याच वेळी सायरन वाजल्याने चोरट्यांनी लोखंडी पहार जागेवर टाकून पोबारा केला. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये चोरटे दिसून येत नाहीत.

नऊ दिवसांनी फिर्यादचोरीच्या प्रकारानंतर बँकेचे व्यवस्थापक सुरेश देसाई, गणेशवाडी, सावरवाडी आणि बीडशेड येथील पोलीस पाटलांनी करवीर पोलीस ठाणे गाठले. त्यांनी ठाणे अंमलदारांना घटनेची माहिती दिली. त्यांनी सर्व पोलीस नंदवाळ येथील आषाढी एकादशी यात्रेला बंदोबस्तासाठी गेले आहेत. त्यामुळे तिकडे येण्यासाठी कोणी उपलब्ध नाही. तुम्हाला आम्ही फोन केल्यानंतर या, असे सांगून त्यांना परत पाठविले. त्यानंतर तब्बल नऊ दिवसांनी चोरीची फिर्याद दाखल करून घेतली.बावीस लाखांची रोकडबँकेतील तिजोरीत सुमारे २२ लाखांची रोकड होती. त्याचा सुगावा चोरट्यांना लागळा असण्याची शक्यता आहे. भरदिवसा बँक फोडण्याचा प्रयत्न झाला असताना सायरन वाजल्याने चोरटे लोखंडी पहार जागेवर टाकून पळून गेले. ते आसपासच्या परिसरातीलच असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यानुसार त्यांचा शोध सुरू आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हाkolhapurकोल्हापूर