शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

कोल्हापूर : शिवाजी स्टेडियमची खेळपट्टी पुन्हा बहरणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 11:21 AM

पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील खेळपट्टी गेल्या तीन वर्षांपासून दुर्लक्षित राहिली आहे. ही खेळपट्टी नव्याने तयार करण्यासाठी उत्तम काळ असतानाही त्याकडे जिल्हा क्रीडा कार्यालय दुर्लक्ष करीत आहे, याबद्दल अनेक क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देशिवाजी स्टेडियमची खेळपट्टी पुन्हा बहरणार का?दोन महिन्यांपासून लोखंडी कुंपन; देखभालीकडे दुर्लक्ष

सचिन भोसलेकोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील खेळपट्टी गेल्या तीन वर्षांपासून दुर्लक्षित राहिली आहे. ही खेळपट्टी नव्याने तयार करण्यासाठी उत्तम काळ असतानाही त्याकडे जिल्हा क्रीडा कार्यालय दुर्लक्ष करीत आहे, याबद्दल अनेक क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.कोल्हापूरचे वैभव असणाºया या मैदानात विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, अजित वाडेकर, कपिल देव, हनुमंतसिंग, सुनील गावस्कर, विश्वनाथ, सलीम दुराणी, फारूक इंजिनिअर, मन्सूर अली पतौडी, पांडुरंग साळगावकर, संदीप पाटील, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा, श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा ते क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, महंमद अझरुद्दीन, नवज्योतसिंग सिद्धू, संजय मांजरेकर यांच्यापासून ते अगदी आता भारतीय संघातून प्रतिनिधित्व करणारा सुरैश रैना अशा एक ना अनेक दिग्गजांनी सामन्यादरम्यान आपल्या फलंदाजीचे प्रदर्शन याच खेळपट्टीवर केले आहे.

यात रणजी ते आंतरराष्ट्रीय प्रथम श्रेणीचे सामनेही याच मैदानात झाले आहेत. यासह स्थानिकांतून महाराष्ट्राला रणजीपटूही याच मैदानाने दिले आहेत. यात रमेश हजारे, मिलिंद कुलकर्णी, सचिन उपाध्ये, नंदकुमार बामणे, रमेश कदम, सदा पाटील, संग्राम अतितकर, आदींचा समावेश आहे.

ही बाब आजच्या पिढीतील खेळाडूंना कदाचित पटणारही नाही; कारण या मैदानाची आजची दुर्दशा त्याला कारणीभूत ठरली आहे. ही दुर्दशा रोखण्यासाठी मैदानाचा आत्मा असणारी खेळपट्टी पूर्ववत व्हावी, अशी मागणी क्रिकेटपटूंकडून होत आहे.१९७१ - सौराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र (रणजी) पॉली उम्रीगर गौरवार्थ सामना, १९७८ - चंदू बोर्डे गौरव सामना, १९७९- महाराष्ट्र-बडोदा (रणजी), १९८२ - मुंबई- पश्चिम विभागीय संघ, पश्चिम विभागीय भारतीय संघ विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील प्रथम श्रेणीचा सामना, १९८६- २५ वर्षांखालील भारत-श्रीलंका यांच्यातील प्रथम श्रेणीचा सामना, १९८८- जिल्हा युवा संघ विरुद्ध इंग्लडचा आर्डब्ले, १९९०- इंग्लंडमधील ससेक्स कौंटी संघ विरुद्ध जिल्हा युवा संघ, १० एप्रिल १९९०- विल्स क्रिकेट संघ- महाराष्ट्र, पांडुरंग साळगावकर गौरव सामना, १९९१- बडोदा- महाराष्ट्र (पश्चिम विभागीय स्पर्धा), १९९२ - ज्येष्ठ प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या गौरवार्थ सामना, १९९४- विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर यांच्या गौरवार्थ सामना, २००१- मुंबई विरुद्ध महाराष्ट्र (रणजी), २००५- महाराष्ट्र-उत्तरप्रदेश (रणजी), २००६- महाराष्ट्र -पंजाब (रणजी), आदी सामने या खेळपट्टीवर झाले आहेत.गेल्या तीन वर्षांपासून खेळपट्टीची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे एकही सामना झाला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून केवळ खेळपट्टीला लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र, कार्यवाही काहीच नाही. त्यामुळे ही खेळपट्टी पुन्हा होईल की नाही, याबाबत क्रिकेटपटूंना शंका आहे. 

देशातील अनेक क्रिकेटपटूंनी या मैदानावरील खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी केली आहे. याच मुशीतून कोल्हापूरचे अनेक क्रिकेटपटूही राज्यासह देशालाही दिले आहेत. त्यामुळे ही खेळपट्टी क्रीडा कार्यालयाने लवकर पूर्ववत करावी.- नंदकुमार बामणे, माजी राष्ट्रीय क्रिकेटपटू

 

 

 

 

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर