शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

खुल्या जागांबाबत  कोल्हापूर जिल्हा परिषदेचे प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 5:02 PM

खुल्या जागा ताब्यात घेण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेने अर्धवट सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी

ठळक मुद्देसुरू केलेले प्रयत्न सोडले अर्धवट, मोहीम हाती घेण्याची गरज

समीर देशपांडे 

 कोल्हापूर : खुल्या जागा ताब्यात घेण्याचा मुद्दा जिल्हा परिषदेने अर्धवट सोडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याआधीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी याबाबत नियोजन केले होते. मात्र आता हा मुद्दा मागे पडला आहे. 

गेले दोन वर्षे विविध वसाहती विकसित झाल्यानंतर त्यातील खुल्या जागा ताब्यात घेण्याबाबत जिल्हा परिषद प्रयत्न करीत आहे. यासाठी एक फॉर्मही तयार करण्यात आला असून, गेल्या वर्षी हा फॉर्म गटविकास अधिकाऱ्यांना पाठवून माहिती मागविण्यात आली होती. मात्र सहा महिने उलटले तरी ही माहिती जिल्हा परिषदेला मिळाली नव्हती. ग्रामपंचायतींच्या खुल्या जागांचा ताबा देण्यासाठी मूळ मालक कधीच तयार होत नाही आणि ग्रामपंचायतीची यंत्रणाही त्यासाठी फारसे प्रयत्न करीत नाही. गावपातळीवर लागेबांधे असल्याने अनेकदा यासाठी पाठपुरावाही केला जात नाही. परिणामी अनेक वर्षे ही जागा मूळ मालकाच्या नावेच राहते आणि मग महसूल खात्यातील ‘नेमक्यांना’ गाठून गुंठेवारी करून ही सार्वजनिक जागाही विकून खाण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. दीड वर्षापूर्वी  ‘लोकमत’ने हा विषय ऐरणीवर आणला. अशातच पाचगाव, शिंगणापूर येथे सार्वजनिक जागाही घशात घालण्याचे प्रकार उघडकीस आले. 

‘लोकमत’ने याबाबत वस्तुस्थिती मांडल्यानंतर याबाबत हालचाली गतिमान झाल्या होत्या. करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी तर यासाठी जिल्हा परिषदेत करवीर तालुक्यातील मोठ्या गावांतील ग्रामसेवकांची बैठकही घेतली होती. इच्छाशक्तीचा अभावशासनाचा याबाबत नियम असतानाही तो धाब्यावर बसवून अनेक रिकाम्या जागा घशात घालण्याचे प्रकार सुरू आहेत. मोठमोठ्या शहरांजवळील जागांच्या किमती प्रचंड असल्याने महसूल विभागाच्याअधिकाऱ्यांना हाताशी धरून गुंठेवारी करून या जागा विकल्या जात आहेत. तरीही जिल्हा परिषदेकडून याबाबत ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र समोर आले असून केवळ इच्छाशक्तीचा अभाव हेच यामागील कारण असल्याचे दिसते. ..............................मानसिकता तयार झालीयगेली दोन वर्षे ‘लोकमत’ने हा विषय लावून धरला आहे. त्यामुळे शिंगणापूर येथील खुल्या जागा विक्रीची गुंठेवारी मंजूर करणाºया प्रांताधिकाऱ्यांनाही दणका बसला असून, ही मंजुरी रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागानेही मध्यंतरी चांगली वातावरण निर्र्मिती केली होती. सचिन इथापे यांनी बैठक घेतल्यानंतर अशा खुल्या जागा ग्रामपंचायतीकडे जमा करण्याची मानसिकता झाली होती. मात्र पुन्हा हे प्रयत्न थंडावले आहेत.  

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर