शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

कोल्हापूरची वीज मीटर प्रतीक्षा संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:26 AM

कोल्हापूर : लॉकडाऊन, वीज बिल थकबाकी यांचे आव्हान आणि माेठा आर्थिक ताण सहन करावा लागत असतानाही महावितरणने त्याची कोणतीही ...

कोल्हापूर : लॉकडाऊन, वीज बिल थकबाकी यांचे आव्हान आणि माेठा आर्थिक ताण सहन करावा लागत असतानाही महावितरणने त्याची कोणतीही सावली ग्राहकसेवेवर पडू न देता मागील पाच महिन्यांत २५ हजार ३६३ नव्या जोडण्या देऊन प्रकाश पसरविला आहे. वीजमीटरच्या टंचाईवरदेखील मात करीत तब्बल ६५ हजार मीटर देऊन दीड वर्षापासूनची मीटरची प्रतीक्षा संपविली आहे.

गेल्या दीड वर्षापासून राज्यभर वीज मीटरची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. नवीन वीजजोडण्याही मंदावल्या होत्या. यावरून महावितरणच्या ग्राहकांमध्ये कमालीचा आक्रोश दिसत होता. यावर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासमवेत झालेल्या बैठकीनंतर वीजजोडणी व मीटरजोडणीची कामे युद्धपातळीवर करण्यासाठी यंत्रणा तैनात केली. याचे परिणाम अवघ्या पाचच महिन्यांत दिसून आले असून, तब्बल १५ लाख ७६ हजार वीजजोडण्यांची कामे पूर्ण करून मीटरही उपलब्ध करून देण्यात आले.

कोल्हापुरातही मागील पाच महिन्यांत २५ हजार ३६३ नवीन वीजजोडण्या दिल्या गेल्या. यापूर्वीचा वीजमीटरचा बॅकलॉग जास्त असल्याने जवळपास ६५ हजार जणांना नवे मीटर देऊन त्यांचा वीजवापर अधिकृत करून दिला.

साहित्याच्या उपलब्धतेअभावी जिल्ह्यात नवीन वीजजोडण्याही खोळंबल्या होत्या. आगाऊ रक्कम भरूनदेखील दोन वर्षांपासून जोडणीच मिळत नसल्याने नागरिकही वैतागले होते. कनेक्शन मिळाले तर मीटर मिळत नव्हते. मग परत महावितरणच्या कार्यालयाकडे चकरा मारायची वेळ आली होती. यावरून सातत्याने तक्रारीदेखील होत होत्या. आता सुविधा मिळू लागल्याने ग्राहकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

चाैकट

दिलेल्या वीजजोडण्या

घरगुती १७ हजार २१८

वाणिज्य ३ हजार १३९

औद्योगिक १ हजार १२

कृषी ३ हजार ३८४

पाणीपुरवठा ९७

पथदिवे १८

इतर ४१५

चौकट

दिलेले वीज मीटर

सिंगल फेज ५७ हजार ८००

थ्री फेज ७ हजार २०६

चौकट

सिंगल फेजचे १५ लाख ६६ हजार, थ्री फेजचे १ लाख १० हजार असे नवीन मीटर राज्यभरात देण्यात आले आहेत.