शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘के.पी.’ मनधरणीसाठी ‘ए. वाय.’ यांच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:42 IST

सरवडे : माजी आमदार के. पी. पाटील यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सोळांकूर (ता. राधानगरी) ...

सरवडे : माजी आमदार के. पी. पाटील यांनी मंगळवारी सकाळी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सोळांकूर (ता. राधानगरी) येथे घरी भेट घेतली. आता आपण लढतो, पुढच्या वेळेला तुम्हाला संधी देतो, असे ‘के. पी.’ यांनी सांगितले; पण गणेशोत्सव सुरू आहे, चार दिवसाने यावर बोलूया, असे ‘ए. वाय.’ यांनी सांगितले. विधानसभेच्या उमेदवारीवरून मेहुण्या-पाहुण्यांमधील संबंध ताणले आहेत. त्यांच्या भेटीने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.‘राधानगरी-भुदरगड’च्या उमेदवारीवरून ‘के. पी.- ए. वाय.’ यांच्यात गेली दोन-तीन वर्षे संघर्ष सुरू आहे. गेली २0-२५ वर्षे एकमेकांच्या आधाराने राजकारण करणाऱ्या या मेहुण्या-पाहुण्यांत ‘भोगावती’च्या निवडणुकीनंतर विघ्ने निर्माण झाली. अलीकडे तर उमेदवारीवरून दोघांत शाब्दिक चकमकही उडाली होती. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणारच असा दोघांनीही निर्धार केल्याने राष्टÑवादीसमोरच पेच निर्माण झाला आहे. राधानगरी-भुदरगडमधील मुंबईतील रहिवाशांच्या मेळाव्यात ए. वाय. पाटील हे आपणास मदत करतील, अशी अपेक्षा के. पी. पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर या दोघांतील चर्चेसाठी प्रयत्न सुरू झाले.मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता के. पी. पाटील यांच्यासह जिल्हा बॅँकेचे संचालक भैया माने व जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील हे ए. वाय. पाटील यांच्या घरी पोहोचले. गेल्या २0-२५ वर्षांत दोघांनी ताकदीने सत्तास्थाने उभी केली. आता भांडत बसलो, तर सगळे अस्थिर होईल, झाले गेले विसरून पुन्हा एकदिलाने काम करूया, असे के. पी. पाटील यांनी सांगितले. विधानसभेच्या उमेदवारीचा वाद आहे, तो आपण बसून सोडवूया, आता मी लढतो, पुढच्या वेळेला तुम्ही लढा, अशी आॅफर ‘के. पी.’ यांनी ‘ए. वाय.’ यांना दिली. पण सध्या गणेशोत्सव आहे, यावर चार दिवसांनी बोलूया, असे ‘ए. वाय.’ यांनी सांगितले. दोघांच्या भांडणात तिसºयाचा लाभ नको, अशा शब्दांत भैया माने, युवराज पाटील यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला...तर एवढी दुखापत झाली नसती‘आजपर्यंत आपण ‘के. पीं.’चा शब्द खाली पडू दिला नाही. त्यांच्यासाठी जिवाचे रान केले. यावेळेला लढतो म्हणालो म्हणजे चूक केली का? दोन वर्षांपूर्वीच त्यांनी बोलावून घेऊन समजावून सांगितले असते, तर त्याचवेळी विषय संपला असता. एवढी दुखापत झालीच नसती. अशी परिस्थिती का निर्माण झाली, हे मलाच कळत नसल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगितले. यावेळी ‘ए. वाय.’ यांचे बंधू आर. वाय. पाटील हेही उपस्थित होते.हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रयत्न‘के. पी.- ए. वाय.’ यांच्यामुळेच आपण जिल्ह्याचा नेता होऊ शकलो, असे जाहीरपणे आमदार हसन मुश्रीफ यांनी कबूल केले होते; त्यामुळे या दोघांतील वाद टोकाला गेला तर त्यातून राष्ट्रवादीचे नुकसान होईल. सध्या या पक्षाला राज्यभर गळती लागली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वाद मिटवून जिथे पक्षाची ताकद आहे, तिथे अंतर्गत वाद मिटवण्यासाठी मुश्रीफ यांनी पुढाकार घेतल्यानेच ही भेट झाल्याचे सांगण्यात येते.