शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

कुरुंदवाडमध्ये प्रशासन, आंदोलकांमध्ये समझोता गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 4:50 AM

* अन्यथा शहराचे नुकसान अटळ गणपती कोळी : कुरुंदवाड शहरातील विविध प्रश्नांच्या आंदोलनातून शहर बचाव कृती समिती ...

* अन्यथा शहराचे नुकसान अटळ

गणपती कोळी : कुरुंदवाड

शहरातील विविध प्रश्नांच्या आंदोलनातून शहर बचाव कृती समिती आणि पालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यात तेढ निर्माण झाला आहे. शहराचा विकास साधण्याचा प्रशासन आणि आंदोलक दोघांचाही उद्देश एकच आहे. मात्र एकमेकांबाबत गैरसमज, स्वाभिमान आणि हटवादी भूमिका यामुळे दोघांमधील ताणलेले संबंध शहराच्या दृष्टीने हितावह नाहीत. त्यामुळे दोघांनाही दोन पावले मागे घेऊन प्रश्नांची चर्चेने सोडवणूक करणे गरजेचे आहे. अन्यथा वैयक्तिक राग, द्वेशामुळे वैयक्तिकतेबरोबर शहराचे नुकसान अटळ आहे.

शहरातील अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेला रस्त्यांचा प्रश्न, रखडलेली नळ पाणीपुरवठा योजना, अतिक्रमण नियमितीकरण यासह नागरी सुविधांच्या प्रश्नावरून कृती समिती आंदोलन करत आहेत.

लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रशासनाने आंदोलकांचा आदर राखत चर्चेद्वारे प्रश्न समजून घेण्याची तसेच प्रश्नाबाबत कोणती कार्यवाही केली, हे सांगण्याची जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे. याउलट वारंवार आंदोलन होत असल्याचे कारण दाखवत आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने त्यातच जमावबंदी आदेश मोडल्याचे कारण सांगत आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्याने वाद अधिक निर्माण झाला आहे. तर आंदोलकांनी मुख्याधिकारी यांच्या निषेधार्थ गाव बंद आंदोलन यशस्वी केल्याने तात्त्विक मतभेदाचे रूपांतर वैयक्तिक दोषावर गेले आहे. त्यामुळे वाद चिघळत आहे.

प्रशासनाच्या नैतिक जबाबदारीबरोबर आंदोलकांनीही अधिकाऱ्यांचा सन्मान राखत त्यांना प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळ आणि सहकार्य करण्याची गरज असते. मात्र शहरात दोन्ही बाजूकडून नेमका याच गोष्टीचा अभाव असल्याने व स्वाभिमान जागृत झाल्याने मुख्याधिकारी आणि आंदोलक दोघांनीही प्रतिष्ठा केल्याने दोहोमधील संवाद संपून संबंध ताणले गेले आहेत. दोघांनीही एकमेकांचा वैयक्तिक राग, द्वेश करत टोकाची भूमिका घेतली आहे. यातून काहीअंशी वैयक्तिक जीवनात नुकसान तर होऊ शकतेच शिवाय शहरासाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे दोघांनाही एकमेकांतील मतभेद, राग, द्वेष संपवून दुरावलेले संबंध आणि संवाद सुरू करण्याची गरज आहे.