शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

शुद्धजल प्रकल्पामुळे कुरुंदवाडकरांना दिलासा

By admin | Published: October 30, 2015 10:41 PM

अनिरुद्ध मोरे यांची सामाजिक बांधीलकी : उल्हास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण उत्साहात

कुरुंदवाड : शहरातील स्वच्छतेबरोबर आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणीही तितकेच महत्त्वाचे आहे. पंचगंगा प्रदूषित नदीकाठावर असलेल्या या शहरात शुद्ध पाण्याची वानवा आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधीलकी म्हणून अनिरुद्ध मोरे यांनी शहरवासीयांसाठी शुद्ध पेयजल प्रकल्प उभारल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.२५ हजार लोकवस्ती असलेल्या शहराला पंचगंगा, कृष्णा नदीने वेढा घातला आहे. शहरासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केला जातो. या नदीतील पाणी चांगले असले तरी प्रदूषित झालेल्या पंचगंगेचे पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्याने पाणी उपसा केला जाणाऱ्या ठिकाणीच पाणी दूषित असते. पालिकेच्यावतीने पाणी शुद्ध केल्या जाणाऱ्या जुन्या तंत्रानुसारच शुद्धिकरण करून शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी पूर्णपणे प्रदूषित असल्याने म्हणावे तितके पाणी शुद्ध होत नाही. परिणामी, नागरिकांना अशुद्ध पाण्याचा सामना करावा लागत आहे.स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी राजकीय गट-तट विसरून शहर स्वच्छतेसाठी कंबर कसली आहे. शौचालययुक्त व प्लास्टिकमुक्त धोरण कडकपणे राबविल्याने शहर स्वच्छतेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे या शहराला पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे.स्वच्छतेबरोबर आरोग्याच्या दृष्टीने शुद्ध पाणी हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पंचगंगा नदी प्रदूषित झाल्याने प्रदूषित पट्ट्यातील टाकवडे, नांदणी, अब्दुललाट, बस्तवाड, औरवाड, आदी गावांनी ग्रामस्थांसाठी ना नफा, ना तोटा या धर्तीवर सेवा संस्था, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शुद्ध पेयजल प्रकल्प राबवून स्वावलंबनातून शुद्ध पाण्याचा प्रश्न सोडविला आहे.कुरुंदवाड शहराला दूषित कृष्णा व पंचगंगा नदीचा विळखा पडला आहे. नगरपालिकेने शुद्ध पेयजल प्रकल्प उभारण्याचा सहा महिन्यांपूर्वीच पालिका सभेत ठराव करण्यात आला. मात्र, त्याची अंमलबजावणी झालीच नाही. अनिरुद्ध मोरे हे शिक्षक असून, त्यांनी सामाजिक बांधीलकी म्हणून स्वखर्चाने सुमारे सात लाख रुपये खर्चून शुद्ध पेयजल प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाचे नुकतेच आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळणार असल्याने शहरवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)