शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Kolhapur Crime: कामावरून पळून गेल्याच्या रागातून मजुराचा खून, दोन महिन्यांनंतर झाला खुनाचा उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 16:09 IST

पन्हाळ्यातील कणेरीच्या जंगलात सापडला होता मृतदेह

आसुर्ले-पोर्ले : काम दिल्यानंतर कामावरून पळून गेल्याच्या रागातून मजुराला परत आणून कोल्हापूर बसस्थानकावर दोघांनी मारहाण केली. या मारहाणीत प्रशांत पांडुरंग कसबले (वय ३५, रा. देसाईवाडी, ता. चंदगड) या मजुराचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर चौघा जणांनी मजुराच्या मृतदेहाची विल्हेवाट पन्हाळा तालुक्यातील कणेरीच्या जंगलात लावली. दोन महिन्यांपूर्वी सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाच्या खिशात असणाऱ्या चिठ्ठीवरून पन्हाळा पोलिसांनी खुनाचा उलघडा केला. पन्हाळा पोलिसांनी चारही आरोपींना मंगळवारी (दि. १९) ताब्यात घेऊन अटक केली आहे. सागर धुळप्पा बंडगर (वय ३८ वर्षे, मातंग गल्ली, रा. खेबवडे, ता. करवीर), शुभम खानू मेटकर (वय २४, रा. महेपैकी जरगवाडी, ता. करवीर), कृष्णात शिंगाप्या धनगर (वय ४६), गोरख शिंगप्पा धनगर (वय ५२, दोघे जण, रा. धनगर गल्ली, ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत.२२ जानेवारी रोजी पन्हाळा पोलिसांना कणेरीच्या जंगलात अर्धवट सडलेल्या स्थितीत अनोळखी मृतदेह आढळला होता. मृतदेहाच्या खिशात मोबाइल नंबर असलेली चिठ्ठी सापडली होती. यावरून मोबाइल दुकानामध्ये मृत व्यक्तीचा मोबाइल दुरुस्तीला टाकल्याचे सिद्ध झाले. दरम्यान, कसबले यांनी दुकानदाराच्या मोबाइलवरून त्याच्या मित्रास फोन केला होता. याबाबत प्रशांत यांच्या मित्राकडे पोलिस समीर मुल्ला यांनी चौकशी केली असता ते गावातून कामासाठी कोल्हापूरला गेल्याचे समजले.कोल्हापूर बसस्थानकावर बाहेरून मजुरीस येणाऱ्यांबाबत चौकशी केली असता मजूर पुरविणाऱ्या सागर बनगरची माहिती पोलिसांना मिळाली. शिवाय, कसबले यांच्या मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण खेबवडे दाखवत होते. आरोपी सागरकडे कसबले यांच्याबाबत चौकशी केली असता बकरी राखण्याचे काम देतो, असे सांगून कसबलेंना सागरने खेबवडेला नेले होते. तीन दिवस गावात ठेवले. त्यानंतर तीन दिवस महे येथील आरोपी शुभम मेटकर याच्याकडे कामाला ठेवले होते. तेथे त्रास झाल्याने पळून जाणाऱ्या कसबलेंना शुभमने बसस्थानकावरून परत आणले. पळून गेल्याच्या रागातून शुभमने लाकडी दांडका व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.त्यानंतर खेबवडे येथे नेऊन कसबले यांना पुन्हा सागर आणि शुभमने दांडक्यांनी मारहाण केली.सागर आणि शुभमने कसबले यांना जखमी अवस्थेत आडूर (ता. करवीर) येथील गोरख आणि कृष्णात धनगर यांच्याकडे कामाला पाठविले. जखमी अवस्थेत असलेले कसबले यांचा मृत्यू उपचार न केल्यामुळे झाला. ही गोष्ट सागरला सांगितल्यावर त्यांनी हात वर केले.प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून आरोपी कृष्णात गोरख धनगर यांनी परस्पर मृतदेहाची कणेरीच्या जंगलात विल्हेवाट लावली असल्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक आप्पासाहेब पोवार, पोलिस निरीक्षक संजय बोंबले, पोलिस निरीक्षक महेश कोंडुभैरी, पोलिस हवालदार समीर मुल्ला, पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष वायदंडे, रवींद्र कांबळे यांनी तपास केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस