शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

नेते प्रचारात तर उत्पादक मात्र चाऱ्यासाठी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्क इंगळी : ‘गोकुळ’च्या सत्ता केंद्रासाठी सर्व नेते राजकारणात व्यस्त आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे हे सत्ता केंद्र अव्याहतपणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इंगळी : ‘गोकुळ’च्या सत्ता केंद्रासाठी सर्व नेते राजकारणात व्यस्त आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे हे सत्ता केंद्र अव्याहतपणे सुरु आहे, ते सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकरी मात्र सध्या चारा टंचाईमुळे त्रस्त आहेत.

जिल्ह्यातील लाखो शेतकरी पशुपालनाच्या माध्यमातून दूध व्यवसायाशी जोडले गेले आहेत. ऊस शेतीमधून शेतकऱ्यांना मिळणारे उत्पन्न अधिक असले तरी दैनंदिन गरजांसाठी दूध व्यवसायावरच अवलंबून राहावे लागते. ग्रामीण भागातील अर्थकारण प्रामुख्याने दूध व्यवसायावरच अवलंबून आहे. अलिकडील काळात पशुधनासाठी लागणाऱ्या चाऱ्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याच्या प्रमाणात घट झाली असून, प्रामुख्याने चाऱ्यासाठी ऊस पिकावरच अवलंबून राहावे लागते.

जिल्ह्यातील बहुतांश भागात पशुधन वर्षातील नऊ ते दहा महिने ऊसापासून मिळणाऱ्या चाऱ्यावरच अवलंबून आहे. सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्याने मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा चारा बंद झाला आहे. गवती कुरण क्षेत्रही घटल्याने चाऱ्याचे प्रमाणही घटले आहे व वळीव पाऊस झाल्याशिवाय आडसाली ऊस व खोडवा पिकामधून चारा काढता येत नाही. त्यामुळे सध्या चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. चाऱ्यासाठी मका व शाळू लागवडीचे प्रमाणही अत्यल्प असल्याने त्याच्या शोधासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागत आहे व चढ्या भावाने खरेदी करून पशुधनाचे संगोपन करावे लागत आहे. दरम्यान, टंचाईच्या या काळात पावसाळ्यासाठी साठवलेला सुका चारा आताच वापरला जात आहे. त्यामुळे पर्यायी दूध उत्पादनात घट होत आहे.

चौकट

उत्पादकामागील विघ्ने वेगळीच..

‘गोकुळ’च्या राजकारणात नेते वारसदारांचे बस्तान बसवण्यासाठी धडपडत आहेत, तर संस्था प्रतिनिधी ‘टोकण’च्या प्रतीक्षेत आहेत. गोकुळचे खरे शिलेदार मात्र या पूर्ण व्यवस्थेपासून दूरच आहेत. कोणत्याही परिस्थितीत इमानेइतबारे पशुधनाची सेवा करायची व संघाला दूध पुरवठा करायचा इथपर्यंतच त्यांची मर्यादा आहे.