शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
2
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
3
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
4
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
5
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
6
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
7
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
8
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
9
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
10
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
11
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
12
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
13
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
14
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
15
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
16
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
17
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
18
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
19
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
20
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक

गळतीच्या पाण्याची बचत

By admin | Published: May 01, 2016 12:45 AM

‘क्रॉस’चे आव्हान पेलले : नियोजनबद्ध काम; ५0 लाख लीटर वाचले

कोल्हापूर : शिंगणापूर पाणी योजनेच्या चार मोठ्या गळती, नवीन पाईपलाईनचे चार ठिकाणी एकाचवेळी जोडकाम असे आव्हानात्मक काम महापालिका पाणीपुरवठा विभागाने नियोजित वेळेपेक्षाही कमी वेळेत पूर्ण केले. दोन दिवसांत केलेल्या या कामांमुळे महापालिकेच्या गळतीमधून वाया जाणारे दर दिवसांचे सुमारे ५० लाख लिटर पाणी वाचले आहे. सलग २० तास पाणी उपसा पंप बंद ठेवून अहोरात्र सुमारे १०० कर्मचारी व यंत्रसामग्रीच्या माध्यमातून एकाचवेळी काम सुरू करून तीन दिवसांचे काम अवघ्या दोन दिवसांत पूर्ण करून ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर शहरात उद्भवणाऱ्या पाणीबाणीवर मात केली. विशेष म्हणजे, हे काम सुरू असताना जाहीर केल्याप्रमाणे निम्म्या शहरात पाणीटंचाईचे सावट असतानाही त्या भागात सुमारे २७ टँकरद्वारे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा केला. त्यामुळे नागरिकांची, नगरसेवकांची एकही तक्रार झाली नाही. कोल्हापूर शहरात सध्या एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यातच शिंगणापूर योजनेतील जलवाहिनीची चार ठिकाणी असलेली गळती काढण्याचे काम गुरुवारपासून हाती घेण्यात आल्याने शहराच्या निम्म्याहून अधिक भागांतील पाणीपुरवठा खंडित करावा लागला. त्यामुळे शहरात पाण्याची अभूतपूर्व कृत्रिम टंचाई निर्माण झाली. गुरुवारी सकाळी सहा वाजता शिंगणापूरहून पुईखडीला नेण्यात येणाऱ्या चार पंपांद्वारे पाण्याचा उपसा बंद केला. त्यानंतर जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह रिकामे करणे, पाणी बाहेर काढणे, गळती काढणे, जुन्या पाईप तोडून नव्या पाईपला जोडणे, वेल्डिंग, आदी कामे अहोरात्र पूर्ण करून शुक्रवारी रात्री १२ वाजता शिंगणापूर योजनेचे चारही उपसा पंप एकापाठोपाठ सुरू करून जलवाहिनी सुरू केली. त्यानंतर शनिवारी पहाटेपर्यंत शिंगणापूर योजनेवर आधारित असणाऱ्या बहुतांशी पाण्याच्या टाक्या काही प्रमाणात भरून त्याद्वारे सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आव्हान पाणीपुरवठा विभागाने पेलले आहे. प्रथमच एकावेळी चार क्रॉस बदलले४दोन दिवस अहोरात्र जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. विशेष म्हणजे या कामात कोणताही अडथळा आला नाही. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई, त्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा अशा अवस्थेत हे काम करताना नागरिकांची तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती. ४त्यासाठी सुमारे १५ दिवस अगोदर गळतीच्या ठिकाणी खोदण्यात आले, तर नव्या जलवाहिनीला जोडण्यात येणाऱ्या ठिकाणीही यापूर्वीच खोदाई केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष गुरुवारी उपसा थांबविल्यानंतर कामाला सुरुवात केली, ते सुमारे वीस तासांनंतरच काम पूर्ण करूनच थांबविले. ४एकाचवेळी चार ठिकाणी जलवाहिनीवर क्रॉस टाकण्याचे धाडसाचे काम प्रथमच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पेलले.आजपासून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठाकोल्हापूर : जलवाहिनीला ‘क्रॉस’ व गळती काढण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण केल्यानंतर शनिवारपासून शहरात पाणीपुरवठा सुरूझाला; पण कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने बहुतांश भागात टँकरनेच पाणीपुरवठा केला. दिवसभरात २७ टँकरद्वारे ११० फेऱ्यांद्वारे कृत्रिम पाणीटंचाईवर मात करता आली. सर्वच भागात आज, रविवारपासून नियोजनानुसार एक दिवसाआड पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने जाहीर केले. गुरुवारपासून फुलेवाडी जकात नाका, रिंगरोडवरील अयोध्या कॉलनी, नवीन वाशी नाका, ए-वन गॅरेज पुईखडी या चार ठिकाणची मोठी गळती काढण्याचे काम, तसेच जुन्या जलवाहिनीतील पाणीपुरवठा नव्या जलवाहिनीद्वारे करण्यासाठी ‘क्रॉस’ टाकण्याचे काम एकाच वेळी सुरु केल्यानंतर गुरुवारपासून शिंगणापूर येथून चारही पंपांद्वारे होणारा उपसा थांबविला होता. ही आव्हानात्मक कामे युद्धपातळीवर पूर्ण करून शुक्रवारी मध्यरात्री शिंगणापूर पाणी योजनेचे चारही उपसा पंप कमी क्षमतेने सुरू करून चाचणी घेण्यात आली. पहाटेनंतर पाणी उपसा करून टाक्या भरल्या; पण कमी कालावधीमुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण न भरल्याने राजारामपुरी, साळोखेनगर, ए वॉर्ड, मंगळवार पेठ, आदी भागांत पाणीपुरवठा झालाच नाही. त्यामुळे या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. शहरात आज, रविवारपासून एक दिवसाआड पूर्णक्षमतेने पाणीपुरवठा होणार आहे. सणगर गल्लीत टँकरदरम्यान, मंगळवार पेठेतील सणगर गल्लीत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. शनिवारी सकाळी या गल्लीत टँकरने पाणीपुरवठा सुरू असताना महिलांत वादावादीचे प्रसंग निर्माण झाले; पण भागातील ज्येष्ठांनी हा वाद मिटविला.