शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Rain update: कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट; मात्र २७ बंधारे पाण्याखालीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 13:56 IST

पूरबाधित क्षेत्रातील कुटुंबांना दिलासा मिळाला. मात्र तळकोकण आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने २७ बंधारे पाण्याखाली आहेत.

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाला ब्रेक लागला. आज, शुक्रवार सकाळपासून अधून-मधून सरी बरसत असल्या तरी पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ३१ फूट  ३ इंच इतकी झाली आहे. इशारा पातळीकडे जाणारे पाणी कमी होत आहे. परिणामी पूरबाधित क्षेत्रातील कुटुंबांना दिलासा मिळाला. मात्र तळकोकण आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने २७ बंधारे पाण्याखाली आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.काल, गुरुवार अन् आज पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभर आकाश ढगांनी भरून राहिले. राहून राहून पावसाच्या बारीक सरी कोसळत होत्या. मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री पंचगंगा नदी पातळी ३२.५ वर पोहचली. इशारा पातळी ३९ असल्याने त्या दिशेने पाणी वाढत होते. पण काल, गुरुवारी सकाळपासूनच पाऊस कमी झाला. यामुळे स्थलांतरित होण्याची तयारी करणाऱ्या कुटुंबांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

गाफील राहू नका...पंचगंगा पाणी पातळी कमी होत असल्याने शहरातील अनेक जण कुटुंबासह पंचगंगा घाटावर पाणी पाहण्यासाठी आले होते. पाणी पाहण्यासाठी आलेल्या काहींना नदीसह सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.राधानगरी धरण

राधानगरी धरणात १०० दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला आहे. धरणातून १२०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे.

२७ बंधारे पाण्याखालीपंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वाळोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, धामणी नदीवरील सुळे व अंबार्डे, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे बंधारे पाण्याखाली आहेत.धरणसाठा असा (पाणीसाठा दलघमीमध्ये)

तुळशी : ४३.७४, वारणा : ३८४.४४, दूधगंगा : २३८.६७८, कासारी :३७, दलघमी, कडवी : २८.५, कुंभी : ३६.५६, पाटगाव : ४५.४, चिकोत्रा : २०.२५, चित्री : १९.४९, जंगमहट्टी : १५.१०, घटप्रभा: ४४.१७, जांबरे : १२.५१, आंबेआहोळ : १९.९५.

तालुकानिहाय पाऊसगुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय असा : हातकणंगले: ७, शिरोळ : ४.१, पन्हाळा : २८.८, शाहूवाडी : २४.६, राधानगरी : ३५.१, गगनबावडा : ८०.६, करवीर :१५.२, कागल :१८, गडहिंग्लज : १९.१, भुदरगड : ४४.३, आजरा : ४२.५, चंदगड : ३२.३.

अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान खात्याने आज, शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे सर्व शासकीय यंत्रणा सतर्क आहेत. आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाल्यास ०२३१-२६५९२३२, ०२३१-२६५२९५०, ०२३१-२६५२९५३, ०२३१-२६५२९५४ या दूरध्वनी क्रमांकावर आणि १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसriverनदीWaterपाणी