शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रक्ताचे नाही, पाण्याचे पाट वाहू द्या; सुळकूड पाणी योजनेवरुन प्रकाश आवाडेंचा मंत्री मुश्रीफांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 13:14 IST

लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणे ही दुकानदारी

इचलकरंजी : तुमच्याकडे कोण बघत नाहीत, ते बघावं म्हणून तुम्ही आंदोलन करता. शासनाने योजना मंजूर केली आहे, ती रद्द केली नाही. पाणी देतो म्हणून शासनाने मला विश्वास दिला आहे. मी सुळकूडचे पाणी आणणारच आहे. तरीही मग आंदोलनाची गरज का? मुद्दाम राजकारण सुरू आहे. त्यासाठी घोळका करून काहींनी दुकाने चालू केली आहेत, असा गंभीर आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी कोणाचेही नाव न घेता केला.येथील घोरपडे नाट्यगृह चौकात ‘इचलकरंजीचा पाणीप्रश्न आणि माझी भूमिका’ या विषयावर आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते.आवाडे म्हणाले, पाण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी विनंती करूया. तुम्ही आंदोलन केले, तर तेही आंदोलन करतील. तुम्ही शिव्या दिल्या, तर तेही देतील. यातून चर्चेनेच मार्ग काढणे योग्य ठरणार आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मी कागदपत्रे घेऊन पालकमंत्र्यांकडे समजून सांगण्यासाठी जातो. पाण्यासाठी काहीही करतो आणि हा प्रश्न सोडवतो. मात्र, काही मंडळी घोळका करून कायम विरोधात आहेत. हीच मंडळी कृष्णा योजनेवेळी विरोधात होती. ह्यो उलटी गंगा आणायला चाललायं, असे म्हणत होते. आजही तिच परिस्थिती आहे. आवाडेंच्या विरोधात बोलल्याशिवाय यांना जमत नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊया.सुरुवातीला आयजीएम, संजय गांधी निराधार योजना, कोरोना काळात केलेले काम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर वस्त्रोद्योगासाठी नक्कीच दिलासादायक काहीतरी करू, असे आश्वासन दिले. प्रकाश दत्तवाडे यांनी स्वागत व राहुल आवाडे यांनी प्रास्ताविक केले. उर्मिला गायकवाड यांनी आभार मानले.

लोकसभा लढवूताराराणी पक्ष कसा स्थापन झाला आणि त्याची जडणघडण याबाबत सविस्तर माहिती देऊन आमदार प्रकाश आवाडे यांनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूकही लढवू, अशी तयारी असल्याचे माजी जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी सभेमध्ये सांगितले.बॅलेट मशीन कमी पडेलसध्या गावात घोळका करून काहीजण एकत्र आले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यावर मी पुढं, काय तू पुढं म्हणून हे सगळे उभारतील. कारण खूपजणांना निवडणूक लढवायची आहे. कदाचित बॅलेट मशीनवर जागा कमी पडेल, असा टोला आवाडेंनी विरोधकांनी लगावला.पालकमंत्री पाण्याचे पाट वाहू द्यासण आहे, जरा सबुरीनं घ्या, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ देतात. मात्र, त्यांच्याकडून रक्ताचे पाट वाहण्याची भाषा येत होती. आमच्याकडून पाण्याचे पाट वाहू द्यात, अशीच भाषा येणार आणि आम्ही सुळकूडमधूनच पाणी आणणार.फायली का अडवतात?गावात पाणीसाठा करण्यासाठी सहा नवीन टाक्या शासनाच्या मागे लागून मंजूर करून आणल्या. त्याच्या फायली काहींनी मुंबईत अडविल्या. त्या फायली का अडवतात, हे आता सर्वांना माहीतच आहे, असे म्हणून टक्केवारीबाबत खोचक टीका केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrakash Awadeप्रकाश आवाडेHasan Mushrifहसन मुश्रीफ