शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:21 AM

कोल्हापूर : पाऊस चांगला पडावा, पर्यावरण जपावे, जंगल वाढले पाहिजे म्हणून आम्हाला जंगलातून बाहेर काढले, शेतीला व पिण्यासाठी लोकांना ...

कोल्हापूर : पाऊस चांगला पडावा, पर्यावरण जपावे, जंगल वाढले पाहिजे म्हणून आम्हाला जंगलातून बाहेर काढले, शेतीला व पिण्यासाठी लोकांना मिळावे म्हणून धरणक्षेत्रातील नागरिकांना बाहेर काढले, पण पुनर्वसनही केले नाही. अनेक वर्षे आम्ही शांततेने आंदोलन केले. आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आंदोलन करून सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ मंगळवारी प्रकल्पग्रस्तांनी अभयारण्याच्या ठिकाणी घेतली.

चांदोली अभयारण्य व वारणा धरणग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या २५ दिवसांपासून आंदाेलन सुुरू आहे. जिल्हाधिकारी पुनर्वसनाबाबत सकारात्मक असताना पुनर्वसनाशी संबंधित विभागांकडून या दिवसांत ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे जागतिक जल दिनाचे औचित्य साधून या अभयारण्यग्रस्तांनी हे अभिनव आंदोलन केले. यावेळी आजपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलने केली व काही मागण्या मान्य करून घेतल्या; परंतु पुढल्या काळात जर आमचे प्रश्न सुटले नाहीत तर आम्ही गनिमी काव्याने सरकारला धडा शिकवू, अशी शपथ घेण्यात आली. यावेळी मारुती पाटील, भगवान काळे, अशोक पाटील, आनंदा आमकर, दगडू पाटील, सुरेश पाटील, पांडुरंग कोठारी, भगवान बोडके, शंकर पाटील, शामराव उंडे, शामराव पाटील उपस्थित होते.

--

फोटो नं २३०३२०२१-कोल-श्रमिक मुक्ती दल

ओळ : प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. याअंतर्गत बुधवारी अभयारण्याच्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी गनिमी काव्याने आंदोलन करण्याची शपथ घेतली.

--