शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

लोकमत जनमतसाठी पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:29 AM

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ आॅगस्ट या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. ई.पी.एस. ९५ उच्चतम पेन्शनवाढीचा शासननिर्णय या ...

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ आॅगस्ट या कालावधीसाठी घेण्यात येणार आहे. ई.पी.एस. ९५ उच्चतम पेन्शनवाढीचा शासननिर्णय या कालावधीत व्हावा. सध्या देशावर आलेल्या कोरोनासारखे सर्वव्यापी संकट, कडक निर्बंध, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती व त्यामुळे वाढती महागाई या सर्वांचा आर्थिक फटका या पेन्शनरांना बसला आहे.

देशातील या पेन्शनधारकांना दरमहा एक हजार इतकी अत्यल्प व तुटपुंजी पेन्शन मिळते. त्यात त्यांचा उदरनिर्वाहाचे काय? पण औषधखर्चही निघत नाही. वाढत्या महागाईच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व हलाखीत या पेन्शनरांना जीवन जगावे लागत आहे.

देशभरातील विविध संघटनांच्या माध्यमातून या पेन्शनरांकडून नऊ हजार महागाई निर्देशांकानुसार पेन्शनवाढीची मागणी होत आहे. सध्या या पेन्शनरांच्या उच्चतम पेन्शनवाढीचा चेंडू केंद्र सरकारच्यावतीने केरळ न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्याचिका व स्पेशल रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्यामुळे कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.

देशभरातील या पेन्शनरांच्या जीवन-मरणाच्या ज्वलंत प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारच्यावतीने संयमाचा व सोशिकतेचा अंत न पाहता, अधिवेशन कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सकारात्मक शासन निर्णय घेऊन मागील फरकासह उच्चतम पेन्शनवाढ बँक खात्यात मागील फरकासह जमा करावी.

- एस. एल. कुलकर्णी, कोल्हापूर