शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: हरयाणात गेम पलटला! भाजप ४५, काँग्रेस ४२; जम्मूमध्ये स्थिती जैसे थे
2
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
3
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
4
Israel Iran War : मोठं युद्ध सुरू होणार? इराणच्या राष्ट्राध्यक्षांना पुतिन भेटणार, इस्त्रायल विरोधात कारवाईची तयारी
5
अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
6
"मला सलमानची बायको व्हायचंय", चाहतीच्या प्रश्नाला अरबाज खानचं हटके उत्तर, म्हणाला...
7
शेअर बाजारानंतर चीन नोकरदारांना शॉक देणार; काय आहे चीनचा 'शॉक २.०'? भारतासह जग दहशतीत
8
अजितदादांना धक्क्यामागून धक्के; शरद पवारांकडे झुकताहेत नेते, लोकसभेनंतर आता विधानसभेलाही शह!
9
वाह क्या बात है! पती-पत्नी एकत्र झाले IPS अधिकारी; जाणून घ्या, नेमकं काय घडलं?
10
Singham Again: मराठमोळ्या लेखकाने लिहिली आहे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'ची स्टोरी, म्हणाला, "मुंबईत आल्यावर पहिल्यांदा..."
11
"कुणाला प्रयोग करायचा असेल तर..."; झिरवाळांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, "जे बोलतात त्यांना..."
12
आजचे राशीभविष्य ८ ऑक्टोबर २०२४; प्रत्येक कार्यात यश मिळण्याची शक्यता
13
कंगना रणौत वादग्रस्त वक्तव्यावरून पुन्हा अडचणीत; कोर्टाने बजावली नोटीस, द्यावं लागणार उत्तर
14
बारामतीनंतर इंदापूरमध्येही मलिदा गँग: शरद पवार; हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
15
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा आज फैसला, विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी
16
जम्मू-काश्मीर, हरयाणाचा कौल कुणाला? हरयाणा, काश्मीरमध्ये भाजपाचा विजयाचा दावा
17
पंतप्रधान मोदींनी लिहिले ‘गरबा’ गाणे; दुर्गादेवीच्या शक्तीचे वर्णन, सोशल मीडियावर केले शेअर
18
सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित; ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पुढे ढकलल्या
19
धारावी घोटाळ्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक नाही; आदित्य ठाकरे यांचा सरकारवर आरोप
20
“जो बोलता है, वो करता है और जो नहीं बोलता, वो...”; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर शरसंधान

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 4:20 AM

गडहिंग्लज : कर्नाटक व आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी ग्रामविकास ...

गडहिंग्लज : कर्नाटक व आंध्रप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

माजी सभापती अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील अल्पभूधारक शेतकरी बैलजोडीच्या साहाय्यानेच शेतीची मशागत करतात. त्यांतील काही हौशी शेतकरी बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेतात.

तथापि, गेल्या ७-८ वर्षांपासून बैलगाडी शर्यतीवर बंदी आल्यामुळे केवळ शेतीसाठी बैलजोडी बाळगणे आणि त्यांचे संगोपन करणे असह्य झाले आहे.

शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे आपल्या बैलांची काळजी घेतो. ही बाब विचारात घेऊन पुन्हा बैलजोडी शर्यतीला परवानगी द्यावी; त्यामुळे ग्रामीण भागातील यात्रा व उरूस यांमध्ये पूर्वीप्रमाणे नवा उत्साह येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.

शिष्टमंडळात राजू जाधव, अरुण फराकटे, चैतन्य खोत, प्रकाश रणनवरे, जावेद पटेल, सूरज पाटील, आदींचा समावेश होता.