शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
3
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
4
Baba Siddique : धक्कादायक! गुरमेल आणि झिशानची जेलमध्ये भेट; १० महिने एकत्र राहिले, चांगली मैत्री झाली अन्...
5
'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..."
6
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
7
मी पुन्हा येईन... कर्मचाऱ्याने असा काही राजीनामा दिला की, होईल २०१९ च्या निवडणुकीची आठवण
8
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
9
BSNL 5G : BSNLच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी! २०२५च्या 'या' महिन्यापासून सुरू होणार 5G; सरकारनं काय म्हटलं?
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
11
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
12
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
13
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
14
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
15
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
16
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
17
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
18
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
19
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी

राधानगरी अभयारण्यातील गावांचा रेंगाळलेला पुनर्वसन प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:23 AM

संजय पारकर लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : विस्तारित राधानगरी अभयारण्यामुळे विस्थापित होणाऱ्या ३० गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय २० ...

संजय पारकर

लोकमत न्यूज नेटवर्क

राधानगरी : विस्तारित राधानगरी अभयारण्यामुळे विस्थापित होणाऱ्या ३० गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय २० वर्षापूर्वी झाला. १० वर्षांपासून त्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र आतापर्यंत एकाही गावाचे पुनर्वसन पूर्ण झालेले नाही. यासाठी २१४.८२ कोटी निधीचा अंदाज व्यक्त केला होता. यापैकी केवळ १८.३० कोटीच मिळाले आहेत. यातून तीन वाड्यांचे काम अर्धवट झाले आहे. निधीची उपलब्धता व या प्रक्रियेची गती पाहता पुढील पन्नास वर्षांतही हे काम पूर्ण होण्याची शक्यता नाही. आंबेओहोळ व उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे ना वन्यजिवांच्या सुरक्षेसाठी लोकांचे स्थलांतर करण्याचा उद्देश सफल झाला; ना लोकांची गैरसोय दूर झाली, अशी स्थिती आहे.

संस्थानकाळात शाहू महाराजांनी दाजीपूरचे हे जंगल शिकारीसाठी राखीव ठेवले होते. स्वातंत्र्यानंतर १९५८ साली याचे राज्यातील पहिले अभयारण्य करण्यात आले. येथे विपुल व दुर्मीळ जैववैविध्य असल्याने १९८५ मध्ये त्याचा विस्तार करण्यात आला. त्याचे क्षेत्रफळ ३५१.१४ चौरस कि.मी. झाले. यात राधानगरी तालुक्यातील संलग्न १२ गावांतील २९ वाड्या-वस्त्या व गगनबावडा तालुक्यातील एका गावाचा समावेश झाला. मात्र त्यावेळी या लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली नव्हती. जसजसे वन्यजीव विभागाचे निर्बंध सुरू झाले अशी लोकांची गैरसोय सुरू झाली. लोकांची ओरड सुरू झाल्यावर २००० सालात महसूल व वन्यजीव विभागाने लोकांचे हक्क व सवलतींची पाहणी केली. त्यावेळी लोकांनी पुनर्वसन करण्याची मागणी केली होती.

शहरात धाव

अभयारण्य होण्यापूर्वी येथील लोक जंगलातील मध, डिंक, हिरडा, बेहडा, तमालपत्री यांसारख्या वनउपज वस्तू जमा करून विकत असत. वन विभाग त्यासाठी लिलाव करीत असे. मात्र हे सर्व आता बंद झाले आहे. हा सर्व परिसर केवळ पावसाळ्यातील पिकांवर अवलंबून आहे. त्यामुळे लोकांना रोजगारासाठी मोठ्या शहरांत धाव घ्यावी लागते. परिणामी येथे राहणाऱ्या लोकांची संख्या तुरळक आहे. एरवी बाहेर राहावे लागतेच; मग पुनर्वसन झाले तर बरेच, अशी या लोकांची मानसिकता आहे.

जमीन संपादित करावी लागेल

सन २००० सालात झालेल्या पाहणीत १२ म्हासुली गावातील ३० वाड्यांतील ११५६ कुटुंबे, १४९९ खातेदार त्यांची १४७७ घरे व २४११.९८ हेक्टर जमीन बाधित होत होती. याशिवाय दूधगंगा धरणाच्या काठावरील अगोदर विस्थापित झालेल्या ८ गावांतील ४११ खातेदारांची ५२९ हेक्टर शिल्लक जमीन संपादित करावी लागेल, असा अहवाल तयार झाला.