शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Elections: अजित पवारांचा पहिला उमेदवार ठरला! फोनवरून नावाची केली घोषणा
2
"मिस्टर शिंदे, ठाकरेंवर बोलताना हे विसरू नका", 'त्या' ट्विटवरून राऊत भडकले
3
आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या,अन्यथा आगामी निवडणुकीत सरकारला पश्चाताप होईल: मनोज जरांगे
4
धक्कादायक! टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव, पगार कापण्याची धमकी; मॅनेजरने उचललं टोकाचं पाऊल
5
"सरकार म्हणजे विषकन्या, सबसिडीच्या भरवशावर राहू नका! लाडकी बहीण सुरू केल्यामुळे..."; नितीन गडकरींचं विधान चर्चेत
6
पोलिसांनी चौकशीला बोलावल्यानंतर Book My Showचे सीईओ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
7
स्वत:शीच लग्न करणाऱ्या जगप्रसिद्ध रिलस्टारने संपविले आयुष्य; चिठ्ठी सापडली
8
पहिल्यांदाच बोनस शेअर देण्याची तयारी; ६ महिन्यांत 'या' शेअरनं दुप्पट केला पैसा, तुमच्याकडे आहे का?
9
पितृपक्ष: सर्वपित्री अमावास्येला ‘असे’ करा श्राद्ध; पूर्वज होतील प्रसन्न, समाधानाने तृप्त!
10
दुसऱ्या लग्नातही सुख नाही, नव्या नवरीनं उचललं टोकाचं पाऊल; पती फोनवर असं काय बोलला?
11
सुपर कॅच! सिराज अगदी स्प्रिंगसारखा वाकला; शेवटच्या टप्प्यात शाकिबचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
फिट राहा! २ वेळा भात खाल्ल्याने वजन वाढतं?; दिवसातून किती वेळा, किती प्रमाणात खावा, जाणून घ्या
13
IND vs BAN : 'हिटमॅन' रोहित झाला 'सुपरमॅन'; हवेत उडी मारुन एका हातात पकडला कॅच (VIDEO)
14
वर्षाताई बाहेर जायला हव्या होत्या! पॅडीच्या एक्झिटनंतर प्रेक्षक नाराज, म्हणाले- "बिग बॉस स्वत:च्या मनाने..."
15
SBI ची सुपरहिट स्कीम : एकदा करा डिपॉझिट, दर महिन्याला होईल कमाई; पाहा संपूर्ण डिटेल्स
16
नवरात्रोत्सव: १० राशींना नवदुर्गेचे वरदान, अकल्पनीय लाभ; धनलक्ष्मीची अपार कृपा, शुभच होईल!
17
लाडकी बहीण योजनेवर नितीन गडकरींचं एक विधान; सरकारची झाली कोंडी, विरोधकांनी घेरलं
18
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
19
पाकिस्तानला मोठा झटका! ६ मंत्रालयांना टाळे, दीड लाख नोकऱ्या गेल्या; आयएमएफकडून कर्जासाठी लोटांगण
20
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता

साहित्य हे समाजमनाचा आरसा

By admin | Published: February 01, 2015 11:54 PM

सुनीलकुमार लवटे : शिरोळमध्ये शब्दगंध साहित्य संमेलनाचे उद्घाटन

शिरोळ : साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे. वस्तुस्थितीला आणि वास्तववादाला धरून असते, तेच खरे साहित्य होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी रविवारी शिरोळ येथे व्यक्त केले.येथे शब्दगंध साहित्य मंच व दीनबंधू भाई दिनकरराव यादव स्मृती साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून लवटे बोलत होते. ते पुढे म्हणाले, जीवन मूल्यांची जपणूक साहित्य करते, जीवन सृष्टीला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यात आहे. या ठिकाणी साहित्य शब्दांचे सुरूंग लावून परंपराचे तुरुंग फोडायचे आहे. तेव्हा साहित्यातील नवा विचार घेऊन वाटचाल केल्यास सुख आणि समृद्धी मिळेल.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन झाले. अनिल कुंभार यांनी स्वागत केले. ज्येष्ठ दलित चळवळीचे नेते विजय खातेदार यांनी प्रास्ताविक केले. दलितमित्र अशोकराव माने म्हणाले, माजी आमदार कै. दिनकरराव यादव यांच्या कार्याचा वारसा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम अनिलराव यादव करीत आहेत. दिनकरराव यादव यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहित्य संमेलन आयोजित केले आहे. यावेळी प्रा. भीमराव धुळूबुळू, प्रा. मोहन पाटील, बुद्धिबळपटू ऋचा पुजारी यांनी मनोगते व्यक्त केली.दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजता ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनास प्रारंभ करण्यात आला. गणेशनगर ते दत्तनगर संमेलनस्थळापर्यंत दिंडी काढण्यात आली. यावेळी आमदार उल्हास पाटील, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीपराव पाटील, ‘गुरुदत्त’चे कार्यकारी संचालक राहुल घाटगे, पंचायत समितीचे सदस्य दरगू गावडे, गजानन संपकाळ, सरपंच सुवर्णा कोळी, उपसरपंच पृथ्वीराज यादव, अनिल यादव, बाळासाहेब शेख, रणजित पाटील, इसूफ मेस्त्री, भगवान कोळी, अमरसिंह पाटील, सुनील इनामदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)