महागावातील जयभारत इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयातून अक्षयने विज्ञान शाखेतून पदवीचे शिक्षण घेतले. यूपीएससी परीक्षेत अक्षयने यश मिळवावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. वडिलांच्या निधनानंतर आई श्रीमती उमा पाटील यांनी घरच्या प्रतिकूल परिस्थितीतही अक्षयला अभ्यासासाठी पाठबळ दिले . मामा (कै ) जयसिंग पाटील यांचीही अक्षयला मोलाची मदत मिळाली.
ॲडिशनल कमिशनर मल्लिकार्जुन उत्तुरे , एलआयसीचे विकास अधिकारी प्रेमकुमार नाईक यांचे मला मार्गदर्शन मिळाले. महागावातील एकाग्रता अभ्यासिकाही उपयुक्त ठरली. आज वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान मिळत असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना अक्षयने सांगितले.