शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

मित्रपक्षांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ‘भाजप’वर मर्यादा, सध्या एकही आमदार नसल्याचे वास्तव

By समीर देशपांडे | Updated: October 28, 2024 13:13 IST

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दोन ठिकाणी उमेदवारी

समीर देशपांडेकोल्हापूर : देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला कोल्हापूरमध्ये आपली ताकद वाढवण्यावर मर्यादा आल्या आहेत. गेल्या २० वर्षांत शिवसेना आणि जनसुराज्य या मित्रपक्षांमुळे भाजपला अनेक मतदारसंघांमध्ये आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. २०१४ साली आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे दोन आमदार निवडून आलेल्या भाजपच्या आमदारांची संख्या २०१९ साली शून्यावर आली हे वास्तव आहे.कोल्हापूर शहर, इचलकरंजी, मलकापूर, आजरा अशी भाजपची ताकद असलेली जिल्ह्यातील काही केंद्रे पहिल्यापासून होती. केवळ छोट्या आंदोलनांच्या माध्यमातून सुभाष वोरा, बाबा देसाई, नाना जरग, बाबूराव कुंभार यांच्यासारख्या अनेकांनी पक्ष जिवंत ठेवला होता. अशातच भाजपआधी कॉंग्रेसला अंगावर घेत शिवसेना जिल्ह्यात प्रवेशकर्ती झाली आणि स्थिरावली. ही किमया भाजपला साधता आली नाही.एकीकडे १९९० पासून शिवसेना अस्तित्व दाखवत असताना, भाजपच्या चिन्हावर १९९९ साली करवीर मतदारसंघातून संग्रामसिंह गायकवाड यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. २००९ साली सुरेश हाळवणकर यांच्या रूपाने जिल्ह्यात पहिल्यांदा इचलकरंजीत कमळ फुलले. त्यावेळी सूर्यकांत पाटील बुदिहाळकर दक्षिणमधून भाजपतर्फे, तर धनंजय महाडिक अपक्ष म्हणून रिंगणात होते.

२०१४ साली भाजपने आपली सर्वोच्च दोन आमदारांची संख्या नोंदवली. हाळवणकर पुन्हा इचलकरंजीतून विजयी झाले, तर अमल महाडिक हे १४ दिवसांत कोल्हापूर दक्षिणमधून आमदार झाले. परंतु, यावेळी कोल्हापूर उत्तरमधून महेश जाधव आणि कागलमधून रिंगणात उतरलेले परशुराम तावरे पराभूत झाले. २०१९ साली हाळवणकर आणि महाडिक दोघेही पराभूत झाले आणि भाजप शून्यावर आला. विधानसभेच्या दहा मतदारसंघांपैकी भाजपला गेल्या १५ वर्षांत केवळ चारच मतदारसंघांत लढण्याची संधी मिळाली आहे.चंदगड, राधानगरी, कोल्हापूर उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, हातकणंगले हे मतदारसंघ परंपरेने शिवसेना आणि जनसुराज्यकडे असल्याने या ठिकाणी भाजपला फारशी कधीच संधी मिळाली नाही. आता तर शिंदेसेना, जनसुराज्य आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा तीन मित्रपक्षांच्या गर्दीत भाजपच्या कमळावर निवडणूक लढवण्यासाठीच मर्यादा आल्या आहेत. जोपर्यंत सर्वजण स्वतंत्र लढत नाहीत तोपर्यंत भाजपची अशीच स्थिती राहणार आहे.

बळ वाढले पण..भाजप नेते चंद्रकांत पाटील हे २०१४ च्या सरकारमध्ये मातब्बर खात्यांचे मंत्री होते. त्यांनी अनेकांना बळ दिले. परंतु, वाटणीला मतदारसंघच कमी असल्याने युतीच्या विजयासाठीच त्यांची ताकद खर्ची पडली. त्यानंतर धनंजय महाडिक हे राज्यसभेचे खासदार झाले आणि ताकद आणखी वाढली. परंतु, मतदारसंघ तितकेच राहिले. त्यामुळेच आता काही मतदारसंघ खेचण्यासाठी भाजप प्रयत्नशील होता. परंतु, एकीकडे एकनाथ शिंदे, अजित पवार आणि दुसरीकडे विनय कोरे त्यांना हलू देत नाहीत, ही सध्याची स्थिती आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणBJPभाजपाMahayutiमहायुती