शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

क्षीरसागर निश्चिंत, महाडिक व्यस्त, कदम अस्वस्थ!; कोल्हापूर उत्तरमधील परिस्थिती चिघळायला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 13:02 IST

क्षीरसागर यांना डावलल्यास प्रचार नाही

कोल्हापूर : विधानसभेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असताना कोल्हापूर उत्तरचीमहायुतीमधीलच राजकीय परिस्थिती चिघळायला सुरुवात झाली आहे. राजेश क्षीरसागर निश्चिंत, खासदार धनंजय महाडिक चिरंजिवांच्या उमेदवारीसाठी व्यस्त आणि या सगळ्यांमुळे सत्यजित कदम अस्वस्थ असे चित्र शुक्रवारी पाहावयास मिळाले.दोन दिवस मुंबईत मुक्काम ठोकून क्षीरसागर शुक्रवारी कोल्हापुरात आले. कोल्हापुरात येताच त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी निश्चित झाली म्हणून त्यांच्या ‘शिवालय’ या घरासमोर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परंतु तो आनंद फार तास राहिला नाही. तोपर्यंत उमेदवारी बदलाची हवा पुन्हा सुरू झाली. म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे आणि उमेदवारी निश्चित असून सोमवारी अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले.परंतु परिस्थिती अस्थिर होऊ लागल्याने त्यांनाही संध्याकाळीच कार्यकर्त्यांचा मेळावा घ्यावा लागला. दुसरीकडे, खासदार महाडिक यांनी शुक्रवारी पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. ते पुन्हा संध्याकाळी कोल्हापुरात आले. याच दरम्यान सत्यजित कदम हे या सगळ्या प्रकाराने अस्वस्थ झाले आहेत. त्यांनी आज, शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे.त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून महायुतीमध्येच धुमशान सुरू असल्याचे दिसून येत आहे. २०२२ साली सत्यजित कदम यांनी उत्तरची पोटनिवडणूक् लढवली होती आणि ८० हजार मते घेतली होती. त्यामुळे ते उमेदवारीवर दावा करत आहेत. दुसरीकडे, क्षीरसागर हे मुख्यमंत्र्यांनी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे सांगत आहेत. महाडिक शिंदे यांना भेटून येत आहेत. या सगळ्यामुळे महायुतीमध्ये परस्पर अविश्वासाचे वातावरण तयार होत आहे.

क्षीरसागर यांना डावलल्यास प्रचार नाहीक्षीरसागर यांनी शुक्रवारी सायंकाळी बुधवार पेठेत घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अनेकांनी आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त केल्या. कृष्णराज महाडिक यांच्या उमेदवारीसाठी सुरू असलेल्या धावपळीवर या ठिकाणी आक्षेप घेण्यात आला. गेल्यावेळच्या पराभवानंतरही ज्या पद्धतीने राजेश क्षीरसागर सातत्याने कार्यरत राहिले, मोठे प्रकल्प आणले, निधी आणला, तरीही त्यांची उमेदवारी हिसकावण्याचा प्रयत्न झाला तर अन्य कोणाचाही प्रचार करणार नाही, असा इशाराही या मेळाव्यात देण्यात आला.

दक्षिणवर परिणामअशा घडामोडींमुळे कोल्हापूर दक्षिणमध्येही परिणाम होऊ शकतो, असा अप्रत्यक्ष इशारा क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले, या खणखणीत नाण्याला बाजूला करणं सोपं नाही. वास्तविक महाडिक हे सत्यजित कदम यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे गेले होते; परंतु तिथे गेल्यावर त्यांनी कदम यांचे नावच घेतले नाही. त्यामुळे कदम यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकMahayutiमहायुती