शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 10:24 AM

Mahatma Gandhi's grandson Arun Gandhi passed away अवनि संस्थेसोबत जवळपास वीस वर्षांचा सहवास. 

कोल्हापूर - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू  Arun Gandhi Passes Away अरुण गांधी  यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कोल्हापुरातील अवनि (अन्न वस्त्र निवारा ) संस्थेच्या बालगृहात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

अरुण गांधी यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला. अमेरीकेमध्ये महात्मा गांधीच्या विचाराचा प्रसार करण्याबरोबर महात्मा गांधींच्या विचारानुसार काम करणाऱ्या जगभरातील कामाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कार्य त्यांनी तहहयात केले. 

अवनि संस्थेसोबत जवळपास वीस वर्षांचा सहवास 

अवनि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरूण चव्हाण हे त्यांचे परम मित्र. दोन्ही मित्र समाजातील वंचित वर्गासाठी तळमळीने व निस्वार्थपणे झटणार, तरीही प्रसिद्धीपासून दूर राहणारे. संस्थेचे कार्य जवळून अनुभवल्यानंतर संस्थेला नेहमीच त्यांनी सर्वतोपरी मदत केली. संस्थेच्या सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या सामाजिक प्रकल्पांना त्यांच्या मदतीमुळे मोठे बळ मिळाले. बालगृह ईमारतीसाठी जागा घेण्यापासून ते ईमारत ऊभी करेपर्यंत व आजअखेर त्यांचे पाठबळ, त्यांचे मार्गदर्शन व आशिर्वाद कायम राहीले. 

दरवर्षी डिसेंबरमध्ये अमेरीकेहून महात्मा गांधींच्या विचाराने भारतात चालणाऱ्या कामाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने ते अभ्यास दौरा आयोजित करत. कोल्हापूरमध्ये अवनि संस्थेच्या कार्याला प्रत्यक्ष फील्ड व्हीजिट होत. अध्यक्षा अनुराधा भोसले यांचे प्रचंड काम बघून त्यांना प्रचंड अभिमान वाटे. आपली मदत योग्य पद्धतीने व योग्य ठीकाणी पोचते व त्यातून वंचित वर्गाची होणारी प्रगती बघून परत जाताना एक आत्मिक समाधान घेऊन ते जात. या वर्षी प्रकृती अस्वास्थ्यामुळे डिसेंबरमध्ये डेलिगेशनसोबत त्यांना येणे शक्य झाले नाही. पण, नातवाच्या एंगेजमेंट निमित्ताने मुंबईला आल्यानंतर अवनिमध्ये एक आठवड्यासाठी आवर्जून आले. परत निघण्याच्या आदले दिवशी प्रकृती बिघडल्याने हॅास्पिटलमध्ये रहावं लागले. त्यातून बरे झाल्यानंतर प्रवास शक्य नसल्याने कोल्हापूरमध्ये राहण भाग होत. 

संस्थेतील अनुराधा मॅडम सोबत फक्त व्यावहारीक औपचारीकपणा नव्हता तर एक वडील- मुलीच आपुलकीचं नात होत. बालगृहातील मुलींचा ऊत्साह, प्रेम व आपुलकीनं काळजी घेण आप्पाजींना एक वेगळाच ऊर्जा देऊन जात होत. स्कॅाट सर्वच बाबतीत अगदिच काटेकोर असल्यांने कोणतीच काळजी नव्हती. अवनिचे कार्यकर्ते सर्व परीवार त्याची काळजी घेत होता व त्यांचे मोलाचे मार्गदर्शही. त्यामुळे त्यांनी ईथला प्रत्येक क्षण आनंदात घालवला. त्यातही तुषारभाईंनी त्यांच्या ईच्छे प्रमाणे सर्व काही व्हावे याची काळजी घेतली. 

आम्हा कुटुंबियांना घरी एक दिवसासाठी  का होईना पण त्यांचा पाहूणचार करण्याची संधी मिळाली. त्यांच्या सोबत छान गप्पा मारता आल्या त्यांचे अनुभवाचे बोल ऐकायला मिळणं हे भाग्यच, त्यांनी दिलेल्या मार्गाने काम करण्याचा प्रयत्न करण हीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली असेल, अशा शब्दात त्यांचे अनुयायी गांधी विचारक संजय पाटील यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. 

 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीkolhapurकोल्हापूरDeathमृत्यू