शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कर्ज प्रक्रियेत सुलभता आणा, कागदपत्रांबाबत जनजागृती करा  : राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 11:33 IST

: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत असलेल्या कर्ज योजनेची नेमकी प्रक्रिया समजली नसल्याने आणि कागदपत्रांअभावी बहुतांश लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांना कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्ज प्रक्रियेत सुलभता आणावी. कागदपत्रांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींनी दिल्या.

ठळक मुद्देकर्ज प्रक्रियेत सुलभता आणा, कागदपत्रांबाबत जनजागृती करा  : राजेश क्षीरसागर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत विविध बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींची बैठक

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत असलेल्या कर्ज योजनेची नेमकी प्रक्रिया समजली नसल्याने आणि कागदपत्रांअभावी बहुतांश लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व अर्जदारांना कर्ज योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्ज प्रक्रियेत सुलभता आणावी. कागदपत्रांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी जिल्ह्यातील विविध बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींनी दिल्या.येथील शासकीय विश्रामगृहात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे आयोजित जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँका, सहकारी आणि खासगी बँकांच्या अधिकारी, प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. महामंडळांतर्गत येणाऱ्या कोणत्याही बँकेने कर्जपुरवठा थांबवलेला नाही. कर्ज घेतलेल्या युवकांकडून त्याचा परतावा सुरळीत होत आहे.

राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने या योजनेसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला असून, याच पद्धतीने इतर बँकांनी कक्ष स्थापन करावा. बोगस कर्जदारांना पाठीशी घातले जाणार नाही, पात्र लाभार्थ्याला न्यायापासून वंचित ठेवले जाणार नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २७ जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्याकरिता योजनांची माहिती देणारे ऑनलाईन शिबिर घेतले जाणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, कौशल्य विकास रोजगारचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राहुल माने, महामंडळाचे जिल्हा समन्वयक सतीश माने, आदी उपस्थित होते.२५७७ लाभार्थ्यांना २१६ कोटींचा कर्ज पुरवठावैयक्तिक कर्ज योजनेत ६ हजार अर्ज प्राप्त झाले. त्यातील २,५७७ लाभार्थ्यांना सुमारे २१६ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला. त्यातील २,२५३ लाभार्थ्यांना १३ कोटी रुपयांचा व्याज परतावा करण्यात आला असल्याची माहिती सतीश माने यांनी दिली.कागदपत्रांअभावी प्रकरणे प्रलंबितबँकांकडून लाभार्थ्यांना कर्ज पुरवठा सुरु आहे. कागदपत्रांअभावी उर्वरित प्रकरणे प्रलंबित असल्याचे सतीश माने यांनी सांगितले. कर्ज पुरवठ्यासाठी बँका मिळत नसल्याचा गैरसमज नागरिकांनी मनातून काढावा. कर्ज प्रकरणासाठी कोणत्याही एजंटची मध्यस्थी लाभार्थ्यांनी घेऊ नये. अधिक माहितीसाठी समक्ष बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन बँकांच्या प्रतिनिधींनी केले. 

टॅग्स :Annasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरkolhapurकोल्हापूर