शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Kolhapur: मांडरेतील विषबाधेचे गुढ वाढले, अनेक प्रश्न अनुत्तरीत; उलटसुलट चर्चेला उधाण

By उद्धव गोडसे | Updated: December 17, 2024 12:08 IST

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

उद्धव गोडसे कोल्हापूर : मांडरे (ता. करवीर) येथील विषबाधा प्रकरणात तिघांनी जीव गमावला, तर एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. विषबाधेच्या घटनेला महिना पूर्ण झाला, तरी अजूनही याचा उलगडा झालेला नाही. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्याशिवाय तपास पुढे सरकणार नसल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.मात्र, विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्याने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. नजरचुकीने झालेली विषबाधा की जाणीवपूर्वक केलेला विषप्रयोग असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. घटना आणि तपासाच्या पातळीवर अनेक प्रश्न अनुत्तरीत असल्याने याचे गूढ वाढले आहे.जबाबात विसंगती का?पांडुरंग पाटील यांच्यासह त्यांच्या तीन मुलांनी मुंगूस चावून दगावलेली कोंबडी शिजवून खाल्ल्याचे निमित्त झाले आणि त्यांच्यासह दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १५ नोव्हेंबरला विषबाधेची घटना घडल्यानंतर १५ दिवसांत तिघांचा बळी गेला. त्यानंतर करवीर पोलिसांनी पाटील यांची सून गंगा आणि बचावलेला लहान मुलगा प्रदीप यांचे जबाब नोंदवले. मात्र, दोघांच्या जबाबात विसंगती येत आहे. विषबाधा झाल्याच्या दिवशी घरात कूकरमध्ये भात शिजवल्याचे गंगा यांनी सांगितले, तर शिट्टी खराब झाल्याने कूकर बंद असून वहिनीने पातेल्यात भात शिजवला होता, असा जबाब प्रदीपने दिला आहे.

मृतांचे कपडे का जाळले?विषबाधा झाल्यानंतर रुग्णांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यांनी उलट्या केल्यानंतर कपड्यांवर त्याचे अंश पडले होते. रुग्णालयातून माहिती मिळताच पोलिसांनी कपडे जप्त करणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. मृतदेहांचे दहन करतानाच नातेवाइकांनी मृतांचे कपडे जाळून टाकले. कपडे जाळण्यास कोणी पुढाकार घेतला? तपासासाठी ते पोलिसांच्या ताब्यात का दिले नाहीत? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.विष चिकनच्या रश्श्यात की भातात?पहिल्या दिवशी जेवलेले पांडुरंग पाटील यांच्यासह दोन मुले कृष्णात आणि रोहित यांना विषबाधा झाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेवलेला लहान मुलगा प्रदीप यालाही विषबाधा झाली. दोन्ही दिवसांत घरात जेवलेल्या गंगा आणि त्यांच्या पाच वर्षीय मुलीला काहीच झाले नाही. दरम्यान, पहिल्या दिवशी एका शेजाऱ्यानेही तेच चिकन खाल्ले होते. त्यांनाही काही झाले नाही. त्यामुळे विष नेमके चिकनमध्ये होते की भातात होते? याचा उलगडा होणे गरजेचे आहे.

नेमके कोणते विष?मृतांच्या पोटातील काही अंश तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. त्यांना कोणत्या विषाची बाधा झाली? याचा उलगडा फॉरेन्सिकच्या अहवालावरून होईल. दरम्यान, पाटील यांच्या घरात पोलिसांना तणनाशकाची बाटली मिळाली आहे. त्याच तणनाशकाचे अंश मृतांच्या पोटात मिळाल्यास विषप्रयोग झाल्याच्या संशयाला बळकटी मिळणार आहे. मात्र, विषप्रयोग कोणी आणि का केला? याचाही उलगडा पोलिसांना करावा लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfood poisoningअन्नातून विषबाधाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस