शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

गूळ खरेदीत मार्केटिंग फेडरेशनने उतरावे शेतकºयांची बैठकीत मागणी : साखरमिश्रित गुळामुळे कोल्हापुरी ब्रँड खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:47 AM

कोल्हापूर : गुळाची मागणी कमी असल्याचे कारण सांगत व्यापारी गुळाचे दर पाडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.

कोल्हापूर : गुळाची मागणी कमी असल्याचे कारण सांगत व्यापारी गुळाचे दर पाडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी मार्केटिंग फेडरेशनने गूळ खरेदीत उतरावे, अशी मागणी गूळ उत्पादक शेतकºयांनी गुरुवारी बाजार समितीत आयोजित केलेल्या बैठकीत केली. साखरमिश्रित गुळामुळे कोल्हापुरी गुळाचा ब्रॅँड खराब झाल्याचेही यावेळी निदर्शनास आणून दिले. दरात सुधारणा न झाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला.

उत्तम पाटील म्हणाले, गुळाचे उत्पादन तेवढेच राहिले; पण गूळ खाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आपण पूर्वी घरात किती गूळ खात होतो आणि आता किती खातो, यासाठी गुळाचे मार्केटिंग व्हायला पाहिजे. बाजार समितीने पुढाकार घेऊन गुळातील पोषक घटकांचे मार्केटिंग करण्यासाठी पुढाकार घ्यावा. साखरमिश्रित गुळाचे प्रमाण वाढल्याचे सांगत रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे म्हणाले, गुजरातमध्ये गूळ शीतगृहात ठेवला जातो. साखरमिश्रित गूळ शीतगृहात वितळत असल्याने कोल्हापूरचे नाव खराब होऊन मागणी कमी होत आहे. त्याचा परिणाम दरावर होत असून राधानगरी तालुक्यातील चांदेचा गूळ कºहाडच्या मार्केटमध्ये जातो. तिथे चांगला दर मिळतो. मग येथे काय झाले?

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे राज्यातील वजनदार नेते आहेत. जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आला असताना त्यांनी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी दादासाहेब पाटील यांनी केली. केवळ मुहूर्ताच्या सौद्याला तुम्ही हजर राहू नका. रोज सौद्यात या, किमान तीनशे-चारशे रुपयांचा दरात फरक पडेल, अशी सूचना तानाजी आंग्रे यांनी केली. त्यावर आजपासून सौद्यात हजर राहून दर वाढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही सभापती कृष्णात पाटील यांनी दिली. उपसभापती अमित कांबळे, सचिव दिलीप राऊत, उपसचिव मोहन सापले, आदी उपस्थित होते.काटेंवर शेतकरी भडकले

भगवान काटे तीन वेळा भाषणासाठी उठून तेच-तेच मुद्दा मांडत राहिल्याने शेतकरी संतप्त झाले. ‘भाषणबाजी बंद करा, दहा वर्षे हेच ऐकतोय; केवळ पेपरमध्ये नाव येण्यासाठी बोलू नका. बाजार समितीचे संचालक म्हणून दर घसरणीवर उपाय काय करणार, ते सांगा?’ असे संजय पाटील (वडणगे) यांच्यासह शेतकºयांनी सुनावले.सदाभाऊंना भेटणारगुळाच्या दराच्या घसरणीबाबत कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची रविवारी (दि. ७) भेट घेणार आहे. सरकारने मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून गूळ खरेदीत उतरावे, अशी मागणी करणार असल्याचे श्रीकांत घाटगे यांनी सांगितले.गुळाची गुणवत्ता तपासणीस प्रयोगशाळा

व्यापारी गुळाच्या रव्यात चाकू मारून त्याची गुणवत्ता ठरवितात. ही पद्धत चुकीची असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. यावर गुळाच्या प्रतवारीसाठी लवकरच प्रयोगशाळा सुरू करीत असल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.