शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
4
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
5
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
6
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
7
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
8
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
9
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
10
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
11
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
12
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
13
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
14
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
15
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
16
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
17
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
18
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
19
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
20
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक

एमआयडीसी कामगारांचा प्रवास होणार सुखाचा

By admin | Published: January 05, 2017 1:02 AM

कारखान्याच्या दारात एस.टी. : मागणीनुसार मिळणार बस; अवैध वाहतुकीतील धोका टळणार

प्रदीप शिंदे--कोल्हापूर --ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे आणि वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना अवैध वडापचा आधार घ्यावा लागतो. मात्र, या धोकादायक प्रवासात अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा घटना घडू नयेत म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कामगारांच्या मागणीनुसार त्यांच्या गावांतून एम.आय.डी.सी.पर्यंत एस.टी.ची विशेष सोय केली आहे. जिल्ह्यामध्ये गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित या औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रामीण भागातील कामगार रोजगारासाठी येतात. त्यांपैकी काहीजण दुचाकीवरून प्रवास करतात. रात्री-अपरात्री दुचाकीवरून प्रवास करताना कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तर ज्यांच्याकडे दुचाकी नाही, त्या कामगारांना व्हॅन, अ‍ॅपेरिक्षा, रिक्षा, जीप यांतून प्रवास करावा लागतो आहे. हे वाहनधारक जास्त पैसे मिळविण्याच्या उद्देशाने प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून जादा फेऱ्या करण्यासाठी वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे या मार्गावर अपघातांमध्ये वाढ होत आहे. निपाणी-मुरगूड राज्यमार्गावर गेल्याच महिन्यात बस्तवडे (ता. कागल) येथे व्हॅन खणीत कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व प्रवाशांच्या मागणीनुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कामगारांच्या सोयीसाठी गावातून एस. टी. उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालते. त्यानुसार आता एस. टी. गाड्या सोडण्याचे व कामगारांना ने-आण करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे कामगारांचा प्रवास सुखकारक आणि सुरक्षित होणार आहे.४२ फेऱ्या प्रस्तावित...गोकुळ शिरगाव व पंचतारांकित कागल एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या व आजूबाजूच्या परिसरांमध्ये राहणाऱ्या कामगारांच्या सोईसाठी ९१ फेऱ्या तिन्ही शिफ्टसाठी कोल्हापूर विभागातर्फे सुरू आहेत. मागणीनुसार या फेऱ्यांमध्ये वाढ करून ३० फेऱ्या नव्याने सुरू केल्या आहेत; ४२ फेऱ्या प्रस्तावित आहेत. नव्याने सुरू झालेल्या एस.टी. कागल पंचतारांकित एम.आय.डी.सी.: नंदगाव, कळे, कागल, गिरगाव, माद्याळ, मुरगूड, म्हाकवे, शेंडूर, गोरंबे, राधानगरी, गारगोटी ते एमआयडीसी.गोकुळ शिरगाव एम.आय.डी.सी : कागल, माद्याळ, करंजीवणे, सावर्डे, हदनाळ, रंकाळा, कागल, नेर्ली, गडहिंग्लज ते एमआयडीसीकामगारांना सवलत : एस. टी. महामंडळाकडून कामगारांना प्रवासी पास दिला जातो. यामध्ये २० दिवसांच्या पैशात ३० दिवसांचा प्रवास करायचा, तर तीन महिन्यांसाठी ५० दिवसांचे पैसे भरायचे आणि ९० दिवस प्रवास करायचा, अशा दोन पासची सोय आहे. अवैध प्रवासातील धोके समोर आल्याने कामगार आता एस.टी.ला पहिली पसंती देत आहेत. त्यामुळे अनेक गावांतून एमआयडीसीपर्यंत गाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. आता गावातील मागणीनुसार गाड्यांची संख्या वाढविली जात आहे.- नवनीत भानप, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग