शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

कॅन्सरला रोखण्यासाठी उपाययोजनांची गरज : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 4:43 AM

जयसिंगपूर : कॅन्सरला शेतकरी जबाबदार नसून, पंचगंगा नदीपात्रातील रासायनिक दूषित पाणीच जबाबदार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. पंचगंगेचे प्रदूषण ...

जयसिंगपूर : कॅन्सरला शेतकरी जबाबदार नसून, पंचगंगा नदीपात्रातील रासायनिक दूषित पाणीच जबाबदार असल्याचे तपासणीतून पुढे आले आहे. पंचगंगेचे प्रदूषण हेच मोठे दुखणे असून, शिरोळ तालुक्याबरोबरच पंचगंगा नदीकाठच्या गावांत कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. कॅन्सरला थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

शिवार सामाजिक विकास व संशोधन सेवा संस्था, जयसिंगपूर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कॅन्सर दिनानिमित्त येथील स्व. शामराव पाटील-यड्रावकर नाट्यगृहात कॅन्सर मुक्ती परिषद झाली.

कॅन्सर तज्ज्ञ डॉ. आशितोष पाटील म्हणाले, धूम्रपानाच्या सवयीमुळे ९५ टक्के लोकांना कॅन्सर होतो. बदलत्या जीवनशैलीमुळे साडेसतरा लाख कॅन्सरचे रुग्ण दरवर्षी आढळतात, तर दररोज अडीच हजार लोकांचा मृत्यू होतो आहे. कॅन्सर होऊ नये यासाठी प्रतिबंध करण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांची मानसिकता बदलावी.

बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड म्हणाले, शिरोळ तालुक्यात कॅन्सरमुक्तीची चळवळ यशस्वी करायची असेल तर विषमुक्त शेती व निरोगी भारत अभियान राबविले पाहिजे.

यावेळी नगराध्यक्षा डॉ. नीता माने, सावकर मादनाईक यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, रेखा देशमुख, आसावरी आडके, मुक्ताबाई वगरे, डॉ. महावीर अक्कोळे, सचिन शिंदे, सागर मादनाईक, अभय भिलवडे, वासुदेव भोजणे, आदी उपस्थित होते. स्वागत नगरसेवक शैलेश चौगुले यांनी केले. शैलेश आडके यांनी आभार मानले.

--------------

चौकट - जीवनशैली बदलण्याची गरज : शंकर गौडा

शेतीसाठी वापरली जाणारी ५०० कीटकनाशके धोकादायक आहेत. औषधे फवारणेबाबत प्रबोधन गरजेचे असून, आरोग्याला की उत्पादनाला महत्त्व द्यायचे हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावे. शिरोळ तालुक्यातील एक हजार शेतकऱ्यांच्या रक्तांचे नमुने तपासले तर आरोग्याची नेमकी वस्तुस्थिती पुढे येणार आहे, असे रायचूर विद्यापीठाचे कार्यकारी संचालक शंकर गौडा यांनी सांगितले.

फोटो - ०४०२२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे कॅन्सर मुक्ती परिषदेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.