शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदी पंतप्रधान होण्यासाठी मंडलिकांना निवडून आणू : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 17:26 IST

आम्ही भाजपचे खंदे समर्थक असल्याने मैत्री आणि नाती बाजूला ठेवून युतीचा धर्म पाळणार आहोत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देमोदी पंतप्रधान होण्यासाठी मंडलिकांना निवडून आणू : चंद्रकांत पाटील मैत्रीपेक्षा ‘युती धर्म’ महत्वाचा : पालकमंत्री

कोल्हापूर : आयुष्यात कमी वेळा अवघड प्रसंग येतात. असे प्रसंग आलेल्यांमध्ये माझ्यासह अमल महाडिक व शौमिका महाडिक आहेत. कारण माझे मित्र व अमल यांचे भाऊ तर शौमिका यांचे दीर धनंजय महाडिक हे  राष्ट्रवादीकडून निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे मनामध्ये द्विधा निर्माण झाली आहे. परंतु आम्ही भाजपचे खंदे समर्थक असल्याने ही द्विधा संपवून मैत्री आणि नाती बाजूला ठेवून युतीचा धर्म पाळणार आहोत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.असेंब्ली रोडवरील एका हॉटेलमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकी दरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, माझ्यासमोर आलेला प्रसंग इतिहासात अनेकांना अनेकवेळा आलेला आहे. महाभारतात तो अर्जुनालाही पडला होता. परंतु श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनातील द्वंद्व संपवून धर्मासाठी लढण्याचे आवाहन केले. त्यानुसार आम्हालाही आमच्या मनातील द्वंद्व संपवून युतीधर्मासाठी लढावे लागेल.

हे करताना समोर मित्र असल्याने मनामध्ये खूप दु:ख होणार आहे. परंतु युती धर्म महत्वाचा असल्याने शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. आता युध्द जाहीर झाले असून पक्ष व उमेदवारही स्पष्ट झाले आहेत.त्यामुळे सहा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मनात कोणतीही किंतु व परंतु राहू नये यासाठी त्यांची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे. युतीसाठी जीवाचे रान करायचे आहे. पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचे हे जनतेने ठरविले आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागायचे आहे.महाडिक युतीचे उमेदवार होण्याच्या प्रयत्नाला अपयशपालकमंत्री पाटील म्हणाले, खासदार धनंजय महाडिक हे शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार व्हावेत, यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु त्याला यश आले नाही. मात्र, मी महाडिक यांच्या बाणेदारपणाला खूप गुण देतो. कारण त्यांनी ठामपणे सांगितले की मी  राष्ट्रवादीतून खासदार झाल्याने या पक्षासोबतच मला राहीले पाहीजे. असे म्हणणारी माणसे राजकारणात खूप कमी आहेत. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटील