शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मोदींकडून एफसीआयच्याही खासगीकरणाचा डाव : राजू शेट्टी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:30 IST

NarendraModi, Bjp, FarmarStrike, RajuShetti, Kolhapur भारतीय अन्नधान्य महामंडळ (एफसीआय) ही देशाला अन्नधान्य पुरविणारी यंत्रणा मोडीत काढून ती अदानी, अंबानींच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव आहे; त्यासाठीच जीवनावश्यक कायद्यासह बाजार समितीच्या अधिनियमांत बदल केला आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.

ठळक मुद्देमोदींकडून एफसीआयच्याही खासगीकरणाचा डाव : राजू शेट्टी यांचा आरोपकंत्राटी शेती पूर्वीपासूनच; पण किती भले झाले

कोल्हापूर : भारतीय अन्नधान्य महामंडळ (एफसीआय) ही देशाला अन्नधान्य पुरविणारी यंत्रणा मोडीत काढून ती अदानी, अंबानींच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव आहे; त्यासाठीच जीवनावश्यक कायद्यासह बाजार समितीच्या अधिनियमांत बदल केला आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचे भले करण्याच्या नावाखाली मोदींकडून धनदांडग्यांचे हितसंबंध जपले जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वच उद्योग बंद पडलेले असतानाही शेती सुरू राहिल्याने उद्योगपतींचा डोळा शेतीकडे वळला आहे. त्यांना सोईचे असे कायदेही सरकारने करून देण्यास सुरुवात केली आहे.

जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करण्यापाठोपाठ बाजार समित्यांच्या बाहेर विक्रीसाठी परवानगी देऊन अब्जावधींची उलाढाल असलेल्या समित्यांसमोर बड्या उद्योगपतींच्या कॉर्पोरेट समित्यांचे आव्हान तयार केले आहे. अन्नधान्य महामंडळ या सरकारी यंत्रणेचे देशभर जाळे आहे. त्यांचे गोडावून, पुरवठ्याची साखळी मोठी आहे.

तोटा वाढत असल्याचे दाखवून त्यँचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. एक देश - एक समिती असे म्हणतात; मग एक किंमत का नाही? हा आमचा प्रश्न आहे. सरकारने आधी किमान हमीभाव जाहीर करावा, कंपन्यांवर कारवाईची तरतूद करावी आणि खुशाल कायदे करावेत.फडणवीसांना टोलादेंवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारावर पुस्तक काढणार असे म्हटले आहे, त्यांनी ते जरुर काढावे, त्यांना माझे समर्थनच आहे; पण सिंचन घोटाळ्यावेळी गाडीभर पुरावे देण्याचा अनुभव त्यांनी विसरू नये, असा टोला शेट्टी यांनी लगावला. स्वत:ची गाडी आधी आणावी, उगीच हवेतील गप्पा मारू नयेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.कडकनाथचा अनुभव..कंत्राटी शेतीचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे. स्वीट कॉर्न, स्ट्रॉबेरी, शेळ्या-मेंढ्या पालन, कडकनाथ कोंबड्यांपर्यंत शेतकऱ्यांनी चांगलाच अनुभव घेतला आहे. महाग दराने बियाणे माथी मारून शेतकऱ्यांना हातोहात फसवून हे कंत्राटदार गायब झाले, त्यांच्यावर कारवाईचे धाडस तरी सरकारने केले का? असा सवालही शेट्टी यांनी केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmer strikeशेतकरी संपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीkolhapurकोल्हापूर