शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालणार

By admin | Published: June 24, 2017 7:01 PM

रामहरी रुपनर : धनगर समाज आरक्षण प्रश्नावरून आंदोलनासाठी महाराष्ट्रभर दौरे

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : राज्यातील धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी येत्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनाला घेराव घालणार असल्याचा इशारा आमदार व राज्यातील धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष रामहरी रुपनर यांनी पत्रकार परिषदेत दिला. राज्यात असणारा १४ टक्के धनगर समाज एकत्र आला तर सरकारची अडचण ठरूशकेल, असेही ते म्हणाले. धनगर समाजाच्या आरक्षण मेळाव्यासाठी शनिवारी आमदार रुपनर कोल्हापुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, धनगर समाजाच्या एस. टी. आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी व समाजात जागृती होण्यासाठी पोटजाती बाजूला ठेवून विविध संघटनांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. सत्तेवर कोणतेही सरकार असो ते धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर नेहमीच बगल देत आले आहे. यासाठी समाजाने एकजूट होऊन सरकारवर दबाव वाढविला पाहिजे. या आंदोलनाची ठिणगी भडकण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्"ांत मेळावे घेण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५ जिल्"ांत मेळावे घेण्यात आले असून, त्यासाठी उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. यातून मिळणाऱ्या लोकसहभागाच्या बळावर आंदोलनाचे उग्र रूप धारण करू, असा इशारा दिला. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी पाठिंबा मिळविण्यासाठी दिलेला शब्द सत्तेवर आल्यावर पाळला नसल्याचा आरोप करत जर राज्यात १४ टक्के असणारा धनगर समाज एकत्र आल्यास राज्य सरकारची अडचण ठरू शकेल, त्यामुळे सरकारने आरक्षणाचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशीही मागणी केली. चौकट.. प्रश्न सोडविण्यास मंत्री जानकर असमर्थ धनगर समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे यापूर्वी दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर यांनी जाहीर केल्याने जानकर हे समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी असमर्थ ठरल्याची टीका आमदार रुपनर यांनी यावेळी केली, तर शिवसेना सत्तेत असूनही गोंधळलेल्या अवस्थेत असून, त्यांनी जनतेची विश्वासार्हता गमावली असल्याचे त्यांनी सांगितले. चौकट.. चंद्रकांतदादा म्हणजे फसवा बाजार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असले तरी अनेक प्रश्न सोडविण्याची धुरा ते महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर सोपवितात. तसेच चंद्रकांतदादांकडे विषय जाणे म्हणजे त्याची सोडवणूक न होणे अगर तो प्रश्न गुंतागुंतीचा करून ठेवणे असेच असल्याने चंद्रकांतदादा म्हणजे फसवा बाजार असल्याचीही टीका आमदार रुपनर यांनी केली.