शहरं
Join us  
Trending Stories
1
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
2
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
3
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
5
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
6
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
7
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
8
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
9
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
10
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
11
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
12
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
13
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
14
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
15
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
16
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
17
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
18
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
20
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी

‘स्वाभिमानी’ची आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 11:07 AM

गेली महिनाभर ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी पायाला भिंगरी लावून बैठका घेऊन मोर्चाची तयारी केली आहे.

कोल्हापूर : चालू गळीत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये द्या, वीजबिलांतील त्रुटी दूर करा, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्या, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांसह आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत. या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम दिला जाणार असून, त्यानंतर आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाणार आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आहे. चालू हंगामात एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी संघटनेने केली होती. सर्व कारखान्यांनी एकरकमी एफआरपी दिली आहे, मात्र उर्वरित दोनशे रुपये कधी देणार, अशी विचारणा संघटनेने केली आहे. वीजबिले भरण्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असताना त्यांच्या प्रश्नांबाबत मात्र महावितरण उदासीन आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. या सगळ्याची आठवण करून देण्यासाठी ‘स्वाभिमानी’ने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.

दुपारी १२ वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होणार असून, राजाराम महाराज पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय धडक दिली जाणार आहे.

मोर्चाची महिनाभर तयारी

गेली महिनाभर ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी पायाला भिंगरी लावून बैठका घेऊन मोर्चाची तयारी केली आहे. त्यामुळे मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी, वीजग्राहक सहभागी होतील, असा दावा ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीRaju Shettyराजू शेट्टी