शहरं
Join us  
Trending Stories
1
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
2
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
3
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना
4
Womens T20 World Cup: यंदा नवा चॅम्पियन! West Indies आउट; New Zealand संघानं गाठली फायनल
5
पक्षात एंट्री अन् १२ दिवसांतच लॉट्री; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर महत्त्वाची जबाबदारी!
6
MVA Seat Sharing: महाविकास आघाडीत धुसफूस; २८ जागांचा नेमका वाद काय?
7
योजनादूतांसाठी महत्त्वाची बातमी: काम नाही अन् पगारही मिळणार नाही, कारण...
8
"संजय राऊत उद्धव ठाकरेंपेक्षा मोठे असतील, त्यांना..."; राऊतांवर बरसले, पटोले काय म्हणाले?
9
लेटर'बॉम्ब'नंतर शरद पवारांची भेट भोवली, आ. सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
10
सलमान खानने खरेदी केली बुलेट प्रूफ कार, बिश्नोई टोळीच्या धमक्यांमुळे सुरक्षेत वाढ
11
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा खरा ठरणार?; मविआत वादाची ठिणगी, टोकाची भूमिका
12
महायुतीचं जागावाटप होणार फायनल? शिंदे, फडणवीस, पवारांची दिल्लीत शाहांसोबत बैठक
13
महाविकास आघाडीने मुख्यमंत्री ठरविण्यापेक्षा विरोधीपक्ष नेता ठरवावा, एकनाथ शिंदेंनी लगावला टोला
14
असा हा लपंडाव! मास्क लावून भाजपचा आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेला, पण कॅमेरे दिसताच...
15
'मला सिल्लोडमधून शिवसेनेचा (UBT) आमदार पाहिजे', सत्तारांविरोधात ठाकरेंचा उमेदवार कोण?
16
IND vs NZ 1st Test Day 3 Stumps : शेवटच्या चेंडूवर 'विराट' विकेट; सर्फराज 'नॉट आउट', आता...
17
दिवाळीची शॉपिंग करताय? 'या' क्रेडिट कार्ड्सवर मिळतेय बंपर ऑफर्स आणि कॅशबॅक...
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; आणखी ५ आरोपींना अटक
19
महाविकास आघाडीत कुरघोडी, जागावाटपावरून वाद; एक मित्रपक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत
20
राजकीय हालचालींना वेग! अजितदादांना आणखी एक धक्का बसणार, 'या' आमदाराने शरद पवारांची भेट घेतली

महापुरामुळे जिल्ह्यात हजार कोटीहून अधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 4:24 AM

कोल्हापूर : जुलैमधील अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार ५० कोटींहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या ...

कोल्हापूर : जुलैमधील अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यात सुमारे १ हजार ५० कोटींहून अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे सुरु असून पुढील काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल, सानुग्रह अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून १७ कोटी ४२ लाख ५ हजार इतका निधी मिळाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शनिवारी दिली.

सध्या जिल्ह्यात पूरबाधित क्षेत्रातील पंचनामे सुरु आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ७ व्यक्तींचा मृत्यू झाला. शासकीय निकषानुसार ६ व्यक्ती आर्थिक मदतीसाठी पात्र असून त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. तर एका व्यक्तीच्या कुटुंबीयांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत मदत देण्याबाबतचा प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करण्यात आला

आहे. हस्तकला, हातमाग, क्षेत्रातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करावेत अशा सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

----------------

नुकसानीचा प्रकार : संख्या : पंचनामे पूर्ण झालेले

पूरबाधित कुटुंब : ७१ हजार २८९ : ६१ हजार ८६४

घरांची अंशत: पडझड : ५ हजार ७८९ : ५ हजार १०३

घरांची पूर्ण पडझड : १ हजार १०७ : ८०९

गोठा पडझड : २ हजार ४६६ : ६४६

दुकानदार : १२ हजार १५७ : ९ हजार ६७५

हस्तकला, कारागीर : १ हजार १६९ :९४१

कृषी नुकसान : ५८ हजार ९९७ हेक्टर: २४ हजार ६७०

जनावरे : लहान मोठी १६१ जनावरे व १३ कुटुंबातील १५ हजार १७८ काेंबड्यांचा मृत्यू

-----------