शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

धर्म, राज, अर्थसत्ता एकत्र आल्यास अधिक हिंसक; ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार यांनी व्यक्त केलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 12:36 IST

चार्वाक ते पानसरे विचारधारा विवेकाची

कोल्हापूर : धर्मसत्ता, राजसत्ता आणि अर्थसत्ता एकत्र आल्यास त्या अधिक हिंसक बनतात. त्याचा विरोध केल्यास विचारवंताचा खून केला जातो. तुरुंगात डांबले जाते. विवेकाचा बळी घेतला जातो. अंधश्रद्धेला खत-पाणी घातले जाते. चार्वाक ते पानसरेंपर्यंतच्या विचारधारांनी विवेक जोपासला. त्यांनी दिलेल्या विवेकवादी विचारांसह जगातील सर्वांत मोठा धर्म असलेल्या मनुष्यधर्माची जोपासना करा. कालसाक्षेपतेच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट तपासा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत आणि ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी येथे सोमवारी केले.डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या अमृतहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. राम गणेश गडकरी हॉलमध्ये झालेल्या व्याख्यानास तुडुंब गर्दी उसळली होती.

‘चार्वाक ते पानसरे’ या विषयावर द्वादशीवार यांनी श्रोत्यांना विचारशील बनवणारी मांंडणी सुमारे तासभर केली. ते म्हणाले, सध्या देशभरात अडीच लाख लोकांना केवळ चौकशीच्या नावाखाली तुरुंगात डांबले गेले. विवेकवादी विचारांच्या सर्व खुनांचे सूत्रधार एकाच विचारधारेचे आहेत. समाजात सत्ताधाऱ्यांची सत्ता मजबूत करण्याचे काम धर्म करतो. एखादा अपवाद वगळता जगातील कोणत्याही धर्माने महिलांना आणि गरिबांना न्याय दिलेला नाही. धर्माचा मोठा पगडा समाजावर असल्याने त्याची सत्यता कधीच पडताळून पाहिली जात नाही. चार्वाक हे अनुभवाचे पक्के होते. चार्वाक आणि अनुभव आद्यधर्म आहे. कोणीही काहीही सांगितले तरी त्याच्यावर पटकन विश्वास ठेवू नका. अनुभवाच्या कसोटीवर जुने आणि नवे तपासण्याची विचारधारा चार्वाक ते पानसरे या विचारवंतांनी दिली.

नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे, डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी मनोगत व्यक्त केले. द्वादशीवार यांनी ‘महात्मा गांधी ॲण्ड क्रिटिक्स’ हा इंग्रजी ग्रंथ डॉ. लवटे यांना भेट दिला. डॉ. बी. एम. हिर्डेकर, समितीचे सचिव डॉ. विश्वास सुतार यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला. समितीचे खजिनदार प्रभाकर हेरवाडे यांनी स्वागत केले. समितीचे अध्यक्ष डाॅ. जी. पी. माळी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. निशांत गोंधळी यांनी आभार मानले.

धर्म, राजकारणी लबाडजगातील प्रत्येक धर्माने आपल्या सोयीनुसार राजकारण केले. त्या-त्या काळाच्या सोयीनुसार धर्मग्रंथात लबाडी केल्या गेल्या. माणुसकीचा धर्म जोपासा अन्यथा केवळ पुण्यतिथी साजरी करणारे अनुयायी म्हणून जगू नका, असेही द्वादशीवार यांनी सांगितले.

अनुभव असाही..हल्ली कोण पुस्तके वाचत नाहीत, व्याख्यानाला येत नाहीत अशी तक्रार समाजात वारंवार ऐकायला मिळते; परंतु वक्ता समाजाला दिशा देणारा असेल तर सभागृहात बसायला जागा राहत नाही याचेच प्रत्यंतर द्वादशीवार यांच्या व्याख्यानावेळी आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर