शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

बालिंगेतील दुर्गंधीयुक्त घनकचरा हलवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:26 AM

लोकमत न्यू्ज नेटवर्क कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथील कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर साचलेला दुर्गंधीयुक्त घनकचरा अखेर ग्रामपंचायतीने हलवला. तिथे साफसफाई ...

लोकमत न्यू्ज नेटवर्क

कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथील कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर साचलेला दुर्गंधीयुक्त घनकचरा अखेर ग्रामपंचायतीने हलवला. तिथे साफसफाई करून तिथे पत्रे मारून बंदिस्त केले आहे. बालिंगे व नागदेववाडी ग्रामपंचायतीला घनकचरा टाकण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्गाशेजारी जागेत गेली अनेक वर्षे घनकचरा टाकला जातो. अलीकडे दोन्ही ग्रामपंचायती अतंर्गत कॉलनी वाढल्याने कचराही वाढला आहे. पावसाळ्यात तर कचरा कुजत असल्याने दुर्गंधी पसरत असते. त्यात या मार्गावरून येणारे जाणारेही येथेच कचरा टाकत असल्याने अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो. यासाठी बालिंगे व नागदेववाडी ग्रामपंचायतीने हा कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता केली आहे. गेली आठ दिवस बालिंगेचे सरपंच मयूर जांभळे, उपसरपंच पंकज कांबळे व सदस्यांनी घनकचऱ्यावर काय मार्ग काढतो येतो, यावर विचार केला. महामार्गाच्या बाजूला पत्रे उभे करून कचरा डेपो बंदिस्त करण्याचा निर्णय घेतला. बेशिस्तपणे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई परिसरातील नागरिक येथे कचरा टाकत आहेत, यासाठी पत्रे उभारले असून रस्त्याच्या बाजूला पत्रे लावून परिसर बंधिस्त करणार आहे. गेली दोन दिवस जे.सी.बी. लावून कचरा खाणीत टाकला असून यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य नंदकुमार जांभळे, रंगराव वाडकर, विजय जांभळे, कृष्णात माळी, धनंजय ढेंगे व नागदेववाडी ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न केले.

बाहेरील कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई

या जागेत घन कचरा, मृत जनावरे, खराब अंथरूण, पांघरूण आदी वस्तू राजरोसपणे टाकली जातात. संबधितांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या वतीने घेतला आहे.

कचऱ्यापासून खतनिर्मितीचा प्रकल्प

कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्पास पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंजुरी दिली असून सहा महिन्यात या कचऱ्याचा योग्य पध्दतीने विल्हेवाट लागेल. त्याचबरोबर ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठीही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून होत असल्याचे सरपंच मयूर जांभळे यांनी सांगितले.