शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

‘आजरा’ कारखाना निवडणुकीच्या हालचाली

By admin | Published: December 07, 2015 11:57 PM

उमेदवारांचा शोध सुरू : विधानसभा-लोकसभा निवडणुकीचे संदर्भ राहणार; संचालकांतील मतभेद चव्हाट्यावर

ज्योतीप्रसाद सावंत-- आजरा साखर कारखान्याच्या मे महिन्यात होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता प्रमुख नेतेमंडळींनी निवडणूक अटीतटीची होणार हे गृहीत धरून गटनिहाय प्रबळ उमेदवारांचा शोध घेण्यासाठी चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे.गत पंचवार्षिक निवडणूक तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर व के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली होती. जयवंतराव शिंपी हे एकमेव टार्गेट करून स्वाभिमानीसह लहान-मोठे गट, पक्ष संघटना यांनी एकत्र येवून एकतर्फी विजय मिळवला. स्वप्नातही ज्यांना आपण कारखान्यात कधी संचालक होऊ असे वाटले नव्हते अशी मंडळीही निवडून आली आणि त्यांचे उखळ पांढरे होण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत.परंतु गेल्या साडेचार वर्षांत कारखाना राजकारणात प्रचंड उलथापालथी झाल्या. कधी या उलथापालथींना विधानसभा-लोकसभा निवडणुकांची झालर तर कधी अंतर्गत हेवे-दावे असाच काहीसा प्रकार घडत राहिला. परिणामी एकत्र निवडून आलेल्या मंडळींच्या राजकीय दिशा बदलल्या. एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली. कधी सहकारी संचालकांवर तर कधी थेट नेतृत्व करणाऱ्या मंडळींवर या प्रकारामुळे संचालकांमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले.राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही राजकीय धूर्तपणा दाखवत राष्ट्रवादी लेबल असणाऱ्यालाच अध्यक्षपदाची संधी दिली. राष्ट्रीय काँगे्रस, शिवसेना यांची उपाध्यक्षपदावर बोळवण करण्यात आली. तर ‘स्वाभिमानी’ला शेवटपर्यंत ठेंगा दाखवला गेला. यामुळे कारखानाविरोधात पाच वर्षांपूर्वी केल्या जाणाऱ्या स्वाभिमानीच्या आंदोलनाची धार मात्र बोथट झाली.आता मात्र राष्ट्रवादीची नेतेमंडळी पुन्हा एकदा ‘जुळणी’ करू लागली आहेत. राष्ट्रीय काँगे्रसचे सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने एक पॅनेल तयार होणार हे स्पष्ट आहे. वसंतराव धुरे, जयवंतराव, मुकुंदराव, उदय पवार, सुधीर देसाई, अल्बर्ट डिसोझा यांच्यासोबत अंजनाताई रेडेकर अशी दिशा स्पष्ट होऊ लागली आहे.दुसरीकडे अशोक चराटी, विष्णूपंत केसरकर, राजू होलम, रमेश रेडेकर, श्रीपतराव देसाई ही मंडळी एकत्र येण्याची शक्यता आहे. अर्थातच अजून बऱ्याच घडामोडी घडणार आहेत. यात बदलही होऊ शकतो. शिवसेना, स्वाभिमानी, भाजप, श्रमुद यांच्याही भूमिका हळूहळू स्पष्ट होत जातील. या भूमिका स्पष्ट झाल्यानंतर रंगत येत जाईल.कारखाना अडचणीत आहे. निवडणुकीचा भुर्दंड नको असा सूर आळवत सत्तारूढ मंडळी ‘बिनविरोध’चा पर्यायही पुढे आणतील. परंतु हा पर्याय फारसा यशस्वी होईल, असे सध्यातरी दिसत नाही.एकंदर कारखान्याची निवडणूक जोरदार होणार असे गृहित धरून प्रमुख नेतेमंडळींनी ‘वजनदार’ उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू केली आहे.