शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
4
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
5
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
6
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
7
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
8
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
9
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
10
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
11
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
12
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
13
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
14
Bigg Boss Marathi 5 : अंकिता वालावलकर टॉप ३ मध्ये नाही? फिनालेआधीच मोठी अपडेट समोर, चाहते भडकले
15
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
16
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
17
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
18
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!
19
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर म्हणतो- "हा सन्मान..."
20
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं

महावितरण, ग्राहकांच्या संयमालाच करंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 4:17 AM

कोल्हापूर : थकीत बिलापोटी महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला असताना बिल भरण्याची ऐपत नसल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ...

कोल्हापूर : थकीत बिलापोटी महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला असताना बिल भरण्याची ऐपत नसल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल ग्राहकाकडून उचलले गेल्याचा प्रकार शुक्रवारी घडल्याने काेणी कोणाला दोष द्यायचा असा पेच निर्माण झाला आहे. कोरोनामुळे ग्राहकराजा कंगाल झाला आहे, तर वसुली नसल्याने महावितरणही डबघाईला आले आहे. या दोघांच्या संयमालाच करंट बसला असून आता सरकारने वेळीच हस्तक्षेप करून तोडगा नाही काढला तर दोघेही देशोधडीला लागणार एवढे मात्र निश्चित.

पावनेदोन वर्षांपासून कोरोनामुळे लादलेल्या लॉकडाऊनने अनेकांचे रोजगार हिरावले. वीज वापरली आहे, म्हणजे बिल हे द्यावेच लागणार हे कळते. पण खायला पैसा उरला नाही तेथे वीज बिलासाठी पैसा आणायचा कुठून या विवंचनेत ग्राहक आहेत. पहिल्या लॉकडाऊन काळातील बिले माफ होतील या आशेवर ग्राहक राहिले. शासनाने हात वर केल्याचे लक्षात आल्यानंतर नव्या वर्षापासून ग्राहकांनी नव्या रोजगाराची वाट धरली, जरा जम बसतोय नाही तोवर एप्रिलपासून पुन्हा कोरोना वाढला आणि जो लॉकडाऊन झाला त्यातून अजूनही सुटका झालेली नाही. सर्वसामान्य ग्राहक घरखर्चाचा हिशेब सांभाळता सांभाळता मेटाकुटीला आला आहे. त्यात भरीस भर म्हणून पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलासह रोजच्या किराणा सामानातही महागाईने कहर केल्याने बचतीचे तीन तेरा वाजले आहेत. अशा परिस्थितीत वीज बिलांची थकबाकी भरायची म्हटली तर किमान चार पाच हजारांवर आकडा गेला आहे. एका दमात ते भरणे शक्य नसल्याने हफ्ते पाडून मिळतील अशी ग्राहकाची अपेक्षा. पण ती पूर्ण होत नसल्याने ग्राहक हतबल आहेत.

ग्राहकांची ही परिस्थिती असताना, महावितरणचे सर्व काही आलबेल आहे, अशातील परिस्थिती नाही. ग्राहकांकडून वसुलीच थांबल्याने वीज खरेदी, वितरणासह कामगारांचा खर्च कशातून भागवायचा याची विवंचना आहे. लोकप्रतिनिधी, ग्राहकांकडून दबाव येत असला तरी कंपनी बंद पडण्यापासून वाचविण्यासाठी वसुली मोहीम तीव्र करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. रक्कम वसूल होत नाही तर थेट वीज कनेक्शन तोडण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

चौकट

जिल्ह्याची ३३७ कोटी ४६ लाख थकबाकी

जिल्ह्यातील ४ लाख ११ हजार ६४४ ग्राहकांकडे ३३७ कोटी ४६ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ४ लाख १ हजार ३०३ ग्राहकांकडे १८० कोटी ५१ लाख रुपये तर सार्वजनिक पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांच्या ५००९ वीजजोडण्यांचे १५२ कोटी २६ लाख रुपये थकले आहेत.

चौकट

हप्ते पाडून देऊ पण कधी

वीज थकबाकीदारांची वीज तोडू नका, बिल भरण्यासाठी हप्ते पाडून द्या अशा सूचना कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी महावितरण कार्यालयात बैठक घेऊन अधिकाऱ्यांना केल्या होत्या. पण त्यांची पाठ फिरल्यानंतर लगेचच वीज जोडण्या खंडित केल्या जात असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह उद्योजकांकडूनही संताप व्यक्त होत आहे. याबाबत शनिवारी आम आदमी पार्टीने महावितरणचे कार्यकारी अभियंता डॉ. एन. आर. गांधले यांची भेट घेऊन जाब विचारला. यावर हप्ते पाडून देण्याचा पुनरुच्चार महावितरणकडून करण्यात आला.