शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
2
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
3
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
4
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
5
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
6
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
7
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
8
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
9
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
10
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
11
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
12
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
13
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
14
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
15
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
16
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
17
नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर, पीएम विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाची वर्ध्यात जोरदार तयारी
18
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
19
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
20
भारतात कुठे वापरले जातात सर्वाधिक कंडोम? राज्याचं नाव जाणून थक्क व्हाल!

सोडून जाणाऱ्यांना सांगत होतो, कपाळमोक्ष ठरलेला आहे; मुश्रीफांच्या बालेकिल्ल्यात जयंत पाटलांची फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 9:08 AM

"ही छ्त्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. या भूमीने सदैव समतेचा पुरस्कार केला. दुर्दैवाने या भूमीतील काही लोकं धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसली आहे," अशा शब्दांत पाटील यांनी हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला आहे.

NCP Jayant Patil ( Marathi News ) : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजितसिंह घाटगे यांचा पक्षप्रेवश सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यावेळी पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचं नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. "पवार साहेब हे सगळं कसं जमवतात या विचाराने आमचे विरोधक बुचकळ्यात पडले असतील. पवार साहेब वस्तादांचे वस्ताद आहेत. शेवटचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला असतो. बरेच लोक पक्ष सोडून गेले. पण लक्षात ठेवा 'जहां पे हम खडे होते हैं, लाईन वहीं से शुरू होती है.' मी आधीही सांगत होतो पवार साहेबांच्या वाट्याला जाऊ नका, कपाळमोक्ष ठरलेला आहे," असं पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घडवाव्या लागतात. राजे समरजितसिंह घाटगे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही आवर्जून उपस्थित राहिलो. पवार साहेब आज स्वतः उपस्थित आहेत हा संदेश कागल विधानसभेला पुरेसा आहे. लोकसभेत ज्यांनी तुतारी हाती घेतली त्या सर्वांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. कागलच्या इतिहासाची नव्याने सुरुवात होत आहे," असं म्हणत जयंत पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना आव्हान दिलं आहे.

समरजीत घाटगेंवर स्तुतीसुमने

 "राजे समरजितसिंह यांनी गेली १० वर्षे अविरतपणे कार्य केले. कारखाना अतिशय आदर्शपणे चावलेला आहे. सत्ता असो वा नसो कार्यरत राहण्याचा बाणा त्यांनी स्वाभिमानाने जपला आहे. ते व्यवसायाने सीए आहेत. विरोधकांची वजाबाकी त्यांना व्यवस्थितपणे करता येते. हिशोब चोख ठेवणारे राजे समरजितसिंह मतदारसंघात विकास घडवतील हा मला विश्वास आहे," अशा शब्दांत जयंत पाटील यांनी घाटगे यांचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, "ही छ्त्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. या भूमीने सदैव समतेचा पुरस्कार केला. दुर्दैवाने या भूमीतील काही लोकं धर्मांध शक्तीच्या बाजूला जाऊन बसली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. इतके सुमार काम करणारा शिल्पकार अद्याप फरार आहे. तो नक्की कोणाचा मित्र आहे? भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली आहे. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लुटले नाही असा कांगावा करत आहेत. कारण गुजरातचे नाव काढले की सत्ताधारी घाबरत आहेत. त्यामुळेच महराजांचा इतिहास बदलण्याचे पाप करत आहेत. बहुजन समजाच्या विचारांचे राज्य येण्यासाठी पवार साहेब पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरत आहे. आपला पक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे. त्यांना तुम्हा सर्वांची साथ हवी आहे," असं आवाहनही यावेळी पाटील यांनी केलं आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkagal-acकागलSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगे