शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

एनडीए, इंडियाकडून  अपेक्षाभंग; चंद्रशेखर राव यांचे टीकास्त्र

By समीर देशपांडे | Updated: August 1, 2023 19:33 IST

कोल्हापूर : इंडियावाल्यांनी देशावर ५० वर्षे राज्य केले. एनडीएलाही अनेक वर्षे सत्ता मिळाली. परंतू या दोघांकडूनही देशाला काय मिळाले ...

कोल्हापूर : इंडियावाल्यांनी देशावर ५० वर्षे राज्य केले. एनडीएलाही अनेक वर्षे सत्ता मिळाली. परंतू या दोघांकडूनही देशाला काय मिळाले हे आपण पाहतो आहोत. त्यामुळेच आम्ही या दोघांकडेही नाही. काही मित्रपक्षांशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार महाराष्ट्रात संघटना बांधणीकडे आम्ही विशेष लक्ष देत असल्याचे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सांगितले. येथील छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी वंदन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्र ही अदभूत भूमी आहे. परंतू पैठणसारखा प्रकल्प असूनही औरंगाबादला दहा दिवसांनी पाणी येते. तेथील विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत एक अहवाल दिला आहे. यावर उपाय म्हणून तेलंगणा मॉडेलची अंमलबजावणी आवश्यक आहे. परंतू या सरकारने विधानसभेत हे मॉडेल स्वीकारणार नाही असे सांगितले. याला आता काय म्हणायचे. महाराष्ट्रात आल्यानंतर मी कोणाचेही नाव घेतले नव्हते. परंतू शरद पवार यांनीच आम्हाला भाजपची बी टीम म्हटले. आता शरद पवारांनीच कॉंग्रेस फोडली. आता त्यांचाही पक्ष फुटला. शिवसेना फुटली, कॉंग्रेसही फुटणार असे ऐकत आहे. आणखी किती तुकडे होणार आहेत माहिती नाहीत. आम्हाला बी टीम म्हणणारे आता भाजपमध्ये घुसलेत.तत्पूर्वी राव यांचे सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर वाटेगावहून परत येवून त्यांनी शाहू समाधीस्थळी अभिवादन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावSharad Pawarशरद पवारBJPभाजपा