शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

परिवर्तनवादी विचारांच्या हस्तक्षेपाची गरज

By admin | Published: May 31, 2017 3:39 AM

गेल्या तीन वर्षांत भाजपने आपल्या सोईने खोटा इतिहास तयार केला. माणसाला लौकिक आमिषे दाखवून सत्ता स्थापन केली. संभ्रमतेचे

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या तीन वर्षांत भाजपने आपल्या सोईने खोटा इतिहास तयार केला. माणसाला लौकिक आमिषे दाखवून सत्ता स्थापन केली. संभ्रमतेचे शस्त्र वापरून बदल आणि परिवर्तनाबद्दल गोंधळ निर्माण केला. शालेय शिक्षणापासूनच हिंदुत्वाच्या उतरंडीचे विष पेरले जात आहे. प्रश्न विचारणारा थेट देशद्रोही ठरविण्यात आला. अशा वातावरणात मूल्यभान असलेल्या परिवर्तनवादी विचारांनी हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे, असे परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी मंगळवारी व्यक्त केले. येथील भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे त्यांना ‘भाई माधवराव बागल पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. यावेळी सत्काराल उत्तर देताना त्या बोलत होत्या. शाहू स्मारक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते. पुष्पा भावे म्हणाल्या, ‘उजव्या दृष्टिकोनाच्या या सरकारने राजकारणासाठी भाषेचा गोड वापर केला. गांधीवधापासून त्याची सुरुवात झाली आणि आता ‘मन की बात’ सुरू आहे. दुसऱ्यावर टीका करीत स्वत: केलेल्या पापांवर पांघरूण घातले गेले. गुजरातमधील बलात्कार, अन्याय, दंगली, प्रतिष्ठेसाठी खून हा त्यांचा इतिहास आहे. आम्ही देशप्रेमी आणि विरोधात बोललेला देशद्रोही, त्याचा थेट शिरच्छेदच करा, असे आदेश दिले जात आहेत. मी उच्च आणि तो डागाळलेला या वंशीय जातीय व्यवस्था पक्क्या केल्या जात आहेत. या असहिष्णूतेच्या विरोधात कलाकारांनी पुरस्कार परत केले तर त्यांची कुचेष्टा करण्यात आली. ‘एफटीआय’सारख्या शिक्षणाच्या उच्चतम जागा ताब्यात घेतल्या जात आहेत. या परिस्थितीत परिवर्तनाचा विचार आणि कृती कार्यक्रम करण्याची आणि हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे.’बारसं स्पेशालिस्ट भावे म्हणाल्या, हे सरकार ‘बारसं स्पेशालिस्ट’ आहे. जुन्या योजनांना नवीन नाव दिले जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांची दुर्दशा होत असताना दुसरीकडे त्यांच्याभोवती ‘अच्छे दिन’चे आभास निर्माण केले आहे.