शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

रुकडीत मशरूमच्या भाजीतून नऊ जणांना विषबाधा; २ लहान मुलांचाही समावेश

By उद्धव गोडसे | Updated: July 23, 2023 14:28 IST

सीपीआरमध्ये उपचार

कोल्हापूर : रुकडी (ता. हातकणंगले) येथील रुकडीवाडीत जेवणातील मशरूममधून नऊ जणांना विषबाधा झाली. हा प्रकार शनिवारी (दि. २२) रात्रीच्या जेवणानंतर घडला. उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू होताच सर्व बाधितांना सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारानंतर सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे.

रजिया गुलाब पठाण (वय५५), इब्राहिम गुलाब पठाण (वय ३५), नझरिन सद्दाम नदाफ (वय २७), नलिमा गुलाब नदाफ (वय ६५), मुमताज इस्माईल नदाफ (वय ४५), मुसबा सद्दाम नदाफ (वय ९), मिसबा सद्दाम नदाफ (वय ८), जन्नत इर्शाद शेख (वय ३५) आणि फारूख इर्शाद शेख (वय २२, सर्व रा. रुकडीवाडी, रुकडी) अशी विषबाधितांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, रुकडी येथील नदाफ कुटुंबीयांनी शनिवारी रात्री शेतातून आणलेल्या मशरूमची भाजी केली होती. जेवणानंतर रात्री दहाच्या सुमारास सर्वांना मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. गावातील खासगी रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगत रुग्णांना सीपीआरमध्ये पाठवले. त्यानुसार सर्व नऊ विषबाधितांना सीपीआरमध्ये दाखल केले. वेळीच उपचार झाल्याने बाधितांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर