शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

नीतेश राणे : वळसंगमध्ये काँग्रेसचा प्रचार प्रारंभ,

By admin | Published: February 11, 2017 11:32 PM

राज्य सरकार विश्वासघातकी भाजप-शिवसेनेवर टीका

संख : राज्यातील भाजप-शिवसेना सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यामध्ये अपयशी ठरलेले आहे. अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये, निवडणुकीच्या कालावधीमध्ये दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. हे सरकार विश्वासघातकी आहे. भ्रष्टाचाराने बरबटलेले आहे. शेतकऱ्यांची कर्जे माफ करायला पैसे नहीत, मात्र उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये जाहिरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन दिलेले आहे. या सरकारची आर्थिक कुवत नाही, असा आरोप आ. नीतेश राणे यांनी केला.वळसंग (ता. जत) येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कॉँग्रेस प्रचार सभेत ते बोलत होते. प्रचाराचा प्रारंभ राणे यांच्याहस्ते करण्यात आला. स्वागत उपसरपंच मनीष चव्हाण यांनी केले, तर प्रास्ताविक उद्योगपती सतीश चव्हाण यांनी केले. सतीश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.आ. राणे म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारसभेमध्ये लोकांना आश्वासने दाखवून मते मिळविली. भोळ्याभाबड्या जनतेने आश्वासनाला बळी पडून परिवर्तन केले; पण अडीच वर्षात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीच केलेले नाही. आत्महत्यांचे सत्र वाढत चालले आहे. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. आता जाब विचारण्याची गरज आहे. आम्ही विधिमंडळात कर्जमाफी करण्यासाठी मागणी केली. परंतु कर्जमाफी करण्याची आर्थिक क्षमताच त्यांची राहिलेली नाही. राज्यात कोपर्डीसारखी घटना घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कायदा, सुव्यवस्था सुरक्षित राहिली आहे काय? असा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली.सध्याचे सरकार हे नालायक लोकांचे सरकार आहे, असे मी म्हणत नाही, तर सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे उद्धव ठाकरेच म्हणतात. शिवसेनेचे मंत्री वर्षा बंगल्यावर भेटायला गेले होते. बाहेर येऊन राजीनाम्याचे पत्र दाखवितात. हा पोरखेळ चालविला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. बाळासाहेब ठाकरे असते तर तोंडावर राजीनामा फेकला असता. हे सत्तेत चिकटून बसलेले आहेत. कॉँग्रेसला सत्ता द्या. आम्ही मराठा, धनगर, लिंंगायत समाजाला आरक्षण देऊ. तालुक्यातील प्रश्न मार्गी लावू. कॉँग्रेसच्या पाठीमागे उभा राहण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.यावेळी जनसुराज्य पक्षाचे नेते बसवराज पाटील, विक्रम सावंत, नाना शिंदे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास तालुका अध्यक्ष पी. एम. पाटील, माजी जि. प. सदस्य आप्पाराय्या बिरादार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, नगराध्यक्ष इकबाल गवंडी, उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे, पं. स. सदस्य प्रकाश भोसले, साहेबराव टोणे व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार उपस्थित होते. उमाजीराव सनमडीकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)चौकशीची मागणीजत तालुक्यामध्ये एमआरजीएस योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचारी लोकांना तुरुगांची हवा खायला पाठविले पाहिजे,अशी मागणी यावेळी राणे यांनी केली.