शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: 'निवडणूक आयोग डेटा अपडेट करत नाहीय', हरियाणाच्या निकालांवर काँग्रेसचा मोठा आरोप
2
'त्या' ५० जागा जिंकण्याचं शरद पवारांचं लक्ष्य; विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती
3
विनेश फोगट, इल्तिजा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला आघाडीवर की पिछाडीवर? वाचा सविस्तर निकाल
4
Election Results 2024: हरियाणात मोठा उलटफेर, निकालात भाजपचं वादळ! हॅटट्रिकसह गुलाल उधळणार?
5
हरयाणात विचित्र परिस्थिती! मतांमध्ये काँग्रेस आघाडीवर, पण जागांमध्ये भाजपा
6
Hina Khan : "खूप वेदना, पैसे परत करणार होते..."; कॅन्सरशी लढणाऱ्या हिना खानने कोणाची मागितली माफी?
7
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची मुसंडी, भाजपा मागे; पण हरयाणात कल पूर्णच फिरला!
8
PM Awas Yojana : PM Awas योजनेंतर्गत तुमची लोनची सबसिडी परतही घेतली जाऊ शकते; पाहा डिटेल्स, तयार ठेवा 'ही' डॉक्युमेंट्स
9
"गणपती दारू प्यायला म्हणून..."; उत्तम जानकरांच्या विधानानं वाद, भाजपा आक्रमक
10
Hero Motorsच्या आयपीओवर मोठी अपडेट, कंपनीनं घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या
11
वृद्धांना तरुण करू सांगणाऱ्या जोडप्याने ३५ कोटी लुटले पण अकाऊंटमध्ये फक्त ६०० रुपये सापडले
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीचं सुसाईड; बॉयफ्रेंडवर गुन्हा दाखल होणार? हायकोर्टाचा निकाल
13
मोठा ट्विस्ट! जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक ९० जागांसाठी, पण आमदार ९५ असणार; सत्ता कशी स्थापन करणार?
14
Navratri 2024: नवरात्रीत अनवाणी चालण्याने खरंच लाभ होतो का? वाचा धार्मिक आणि शास्त्रीय कारण!
15
"पती पार्किंगमधून बाईक घेण्यासाठी गेला पण परत आलाच नाही..."; पत्नीने सांगितली आपबिती
16
IRE vs RSA : "हाय हाय यह मजबूरी"; ODI मध्ये बॅटिंग कोचवर आली फिल्डिंगसाठी मैदानात उतरण्याची वेळ!
17
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन अखेर ईडीसमोर हजर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
Ankita Walawalkar अंकिता वालावलकर लवकरच बांधणार लग्नगाठ, तिचा होणारा नवरादेखील आहे सिनेइंडस्ट्रीतला
19
Navratri 2024: लक्ष्मी मातेने वाहन म्हणून घुबडाची निवड का केली असावी? घुबड दिसणे शुभ की अशुभ? वाचा!
20
"पंतप्रधान मोदींनाही जिलेबी पाठवणार"; विजयाआधीच काँग्रेस कार्यालयात मिठाईचे वाटप सुरु

वरुणराजा रुसला, कोल्हापुरात गेल्या २१ दिवसांत थेंबही नाही बरसला; पिकांची वाढ खुंटली

By राजाराम लोंढे | Published: September 02, 2023 2:22 PM

कृषी विभागाकडून नुकसानीचा नजर अंदाज

राजाराम लोंढेकोल्हापूर : गेल्या २१ दिवसांत शिरोळ तालुक्यातील ‘शिरोळ’ व ‘कुरुंदवाड’ या मंडळांत पावसाचा एक थेंबही झालेला नाही. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले असून वाढ खुंटली आहे. कृषी विभागाने पिकांच्या नुकसानीचा नजर अंदाजाचे काम सुरू केले असून विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के नुकसानभरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही कमी-अधिक प्रमाणात पिकांना झटका बसला असून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.मान्सूनच्या गेल्या तीन महिन्यांत जेमतेम महिनाभर पाऊस झाला असून दोन महिने पावसाचा लपंडाव सुरू आहे. मुळात पेरण्या उशिरा झाल्याने सध्या पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पिकांची मुळे कोवळी असल्याने त्यांना पाण्याची गरज आहे. मात्र, पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. आज पाऊस सुरू होईल, उद्या सुरू होईल, या आशेवर शेतकरी रोज आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. कडकडीत ऊन पडत असल्याने चिंता वाढली असून, मोठ्या कष्टाने जगवलेली पिके डोळ्यांसमोर करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले आहे.

शिरोळ तालुक्यातील दोन मंडळांमध्ये तब्बल २१ दिवसांपासून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही. जिल्ह्यातील बहुतांश मंडळांमध्ये ८ ते १० दिवस पाऊसच नाही.पिकांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

जिथे पाण्याची सोय आहे, तिथे पाणी देऊन तर जिथे नाही तिथे घागरीने पाणी आणून पिकांना जगवण्याची धडपड शेतकऱ्याची सुरू आहे.कृषी अधिकाऱ्यांचे दौरे सुरू

पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या अधिकारी दौऱ्यावर असून तालुकानिहाय आढावा घेऊन उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.पावसाचा अंदाज आणि ढगाळ वातावरण

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस होताना दिसत नाही. शुक्रवारपासून तुरळक पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या आहेत. मंगळवारपासून (दि. ५) जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.कमी वाढीवर फुलोरा येण्याचा धोकावाढ सुरू असताना पाणी मिळाले नाहीतर पूर्ण वाढ होणार नाही. त्यामुळे वाढ न होताच शेंगा, फुलोरा येण्याचा धोका अधिक असल्याचे मत कृषी विभागाचे आहे.

शेततळ्याला महत्त्व आलेशासनाने मागेल त्याला शेततळे देण्याची योजना आणली आहे. मात्र, जिल्ह्यातून त्याला अत्यल्प प्रतिसाद आहे. पावसाच्या काळात शेततळी भरून ठेवली असती तर त्याचा वापर आता करता आला असता, त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेततळ्याचे महत्त्व कळले आहे.

पावसाने ओढ दिल्याने माळरान, डोंगरमाथ्यावरील खरीप अडचणीत आले आहे. पाण्याची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी पाणी देण्याची गरज आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस सुरु होईल, असा अंदाज आहे. - दत्तात्रय दिवेकर (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी