शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

ही जन आशीर्वाद नव्हे, शिव्याशाप यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:29 AM

कोल्हापूर : प्रचंड प्रमाणात महागाई वाढली असताना भाजपच्या मंत्र्यांची महाराष्ट्रातील जन आशीर्वाद ...

कोल्हापूर : प्रचंड प्रमाणात महागाई वाढली असताना भाजपच्या मंत्र्यांची महाराष्ट्रातील जन आशीर्वाद यात्रा ही शिव्याशाप यात्रा आहे अशी बोचरी टीका जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या पाटील यांनी भाजपचा समाचार घेतला.

पाटील म्हणाले, पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. जनता यामुळे हैराण झालेली असताना भाजपची महाराष्ट्रातून जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. बिचारे गावागावातून फिरत आहेत; परंतु महागाईमुळे हैराण झालेल्या जनतेचे शिव्याशापच त्यांना मिळत आहेत. कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर ठेवलेल्या तिरंग्यावर भाजपचा तिरंगा पांघरल्यामुळे राष्ट्राला प्राधान्य देणाऱ्या नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. नागरिक हे सहन करणार नाहीत. भाजपला देशापेक्षा पक्ष मोठा वाटतो हेच यातून दिसले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी ‘न कळणाऱ्यांना दिलं; परंतु कळणाऱ्यांना द्यायला वेळ का लागतोय’ अशी विचारणा केली असता यावर आपल्याला बोलण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगितले, तसेच शेट्टी यांच्या सांगलीतील पत्रकार परिषदेला भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते याबाबत विचारल्यानंतर मात्र पाटील यांची कोंडी झाली. शेट्टी हे महाविकास आघाडीचे घटक असताना असे कसे असे विचारल्यानंतर, बघू, असे सांगत प्रतिक्रिया देणे टाळले. शेट्टी यांच्या मागण्यांचा तपशील माझ्याकडे आला नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

न्यायालयीन याचिकांमुळे काही निर्णय बाकी आहेत. म्हणूनच शिवस्मारकाचे काम थांबले आहे. आमच्या सरकारची ते पूर्ण करण्याची इच्छा आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.