शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

आता उसावर लष्करी अळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:26 AM

कोपार्डे : महापुरातून वाचलेल्या उरल्यासुरल्या उसाच्या पिकावर आता लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. उसाला शिल्लक असणारी हिरवट पाने कुरतडल्याने ...

कोपार्डे : महापुरातून वाचलेल्या उरल्यासुरल्या उसाच्या पिकावर आता लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. उसाला शिल्लक असणारी हिरवट पाने कुरतडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जुलै महिन्यात महापुराने नदीबुड क्षेत्रातील ऊस पीक तब्बल १० ते १५ दिवस पाण्याखाली होते. यावर्षी ढगफुटीसदृश पावसाने जमिनीचे मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले. याचबरोबर पाण्याच्या प्रवाहाने जमिनीची धूप होऊन महापुराच्या पाण्यात जास्त रेताड पाणी आल्याने ऊस पिकावर मातीचा थर बसला आहे. यात ऊस पीक जमीनदोस्त झाले आहे. तर सुरळी वाळल्याने उसाचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली. त्यातच नदीबुड क्षेत्रातील उसावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एका रात्रीत ही अळी शेकडो एकर क्षेत्रातील उसाच्या पिकावर हल्ला चढवत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पुराच्या तडाख्यातून वाचलेल्या ऊस पिकाची हिरवी पानेही लष्करी अळी फस्त करत आहे. त्यामुळे पानांच्या शिरा फक्त शिल्लक राहत आहेत.

चौकट : महापुराच्या पाण्यात शेतीला विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर ९५ टक्के पुराच्या पाण्याखाली गेल्याने खराब झाले आहेत. विद्युत पोल कोसळले असून, वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे शेतीपंपाची वीज खंडित झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या पावसाने दडी मारल्याने माळरानावरील आडसाली लागण, भुईमूग, पोटरीत आलेले भात व सोयाबीन पिके धोक्यात आली आहेत.

चौकट : गवतावरही अळीचा प्रादुर्भाव

ऊस पिकाचा फडशा पाडल्यानंतर ही लष्करी अळी शेजारी असणाऱ्या गवतावर हल्ला चढवत आहे. त्यामुळे ओल्या वैरणीची टंचाई वाढली आहे.