शहरं
Join us  
Trending Stories
1
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
2
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
3
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
4
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
5
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
6
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
7
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
8
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
9
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
10
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
11
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
12
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
13
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
14
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
15
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
16
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
17
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
18
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
19
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

मोबाईलवर मिळणार आता पिकाचा अंदाज

By admin | Published: May 28, 2017 1:17 AM

शिवाजी विद्यापीठात ‘अ‍ॅप’ विकसित : बी.टेकच्या विद्यार्थ्यांचे संशोधन; शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येणार

तानाजी पवार । लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय गाजत आहे. शेतातून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढू लागले आहे; पण भविष्यात कोणते पीक घ्यावयाचे याचा अंदाज आला तर शेतकऱ्यांचे भविष्यातील नुकसानही मोठ्या प्रमाणात टाळता येणे शक्य आहे. त्याप्रमाणे शिवाजी विद्यापीठातील ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसित केले आहे. याद्वारे हवामान, पाणी, माती आणि पावसाचे प्रमाण याचा विचार करून पुढील सहा महिन्यांत कोणते पीक घेता येईल हे शेतकऱ्यांना ठरविता येणार आहे. राज्यात शेतकऱ्यांना नुकसानीस सामोरे जावे लागल्याने त्यांची आर्थिक कचाट्यातून मुक्ती न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्येचे लोण दिवसेंदिवस वाढतच आहेत, त्यामुळे कर्जमुक्ती करा म्हणून अनेक नेत्यांचा नारा सुरू आहे; पण शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पीक नुकसानीवर उपाययोजना काढल्यास कर्जमाफीची गरजच भासणार नाही, तसा प्रयत्न शिवाजी विद्यापीठातील ‘बी. टेक’च्या विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यांनी ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ तयार करून अडचणीतील शेतकऱ्यांना एक दिलासा दिला जाणार आहे. अ‍ॅपमुळे शेतकऱ्याला आपल्या परिसरातील लागवड केलेल्या विविध पिकांची आवश्यक आणि मूलभूत माहिती पुरवून त्यांचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. मातीची गरज, लागवडीची प्रक्रिया, हवामानातील गरज, पिके, रोग व कीड, खते आणि कीटकनाशके याविषयी या अ‍ॅपद्वारे माहिती शेतकऱ्यांना देता येणे सोपे होणार आहे. विशिष्ट पिकांसाठी किती क्षेत्र लागवड करायचे हे तो शेतकरी ठरवू शकतो, या अ‍ॅपद्वारे पिकांचे नियोजन करता येते, त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या संकटांना सामोरे जावे लागणार नाही. बाजारपेठेची माहिती मिळणारशेतकऱ्यांना विविध पिकांच्या बाजारातील किमतीची आवश्यक आणि मूलभूत माहिती पुरवून त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होणार आहे. अ‍ॅपवरील माहितीमुळे शेतकऱ्यांला पेरणी करणाऱ्या पिकांची निवड करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला अधिक नफा मिळेल, अशाप्रकारे शेतकऱ्यांना जीवनशैली सुधारण्यास मदत होईल. या ‘अ‍ॅप’वरील नकाशाच्या मदतीने शेतकऱ्याला आपले उत्पादन विक्रीसाठी नजीकची बाजारपेठ शोधण्यास मदत होणार आहे.सरकारी योजनांचीही अद्ययावत माहितीया अ‍ॅपद्वारे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे ध्येय, अद्ययावत माहिती पुरवून शेतीमालामध्ये पारदर्शकता वाढविता येते. कृषी संबंधित कोणतीही योजना सरकार सुरू करत असल्यास त्याची अद्यायावत माहिती या अ‍ॅपद्वारे शेतकऱ्याला पुरवली जाणार आहे तसेच नवीन खते किंवा पीक रोगाबाबत माहिती पुरवली जाणार आहे.शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने हे ‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसित केले आहे. त्याबाबत अनेक शेतकऱ्यांशी चर्चा करून हे अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप येत्या पंधरा दिवसांत ‘गुगल प्ले स्टोअर’वर उपलब्ध होईल. - प्रसन्न करमरकर, सहायक प्राध्यापक, संगणक शास्त्र विभाग‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’साठी या विद्यार्थ्यांचे योगदान‘अ‍ॅगड्रॉईड-अ‍ॅप’ विकसित करण्यासाठी सहायक प्राध्यापक प्रसन्न करमरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले, तर त्यासाठी शिवाजी विद्यापीठ ‘बी.टेक’च्या अंतिम वर्षातील विवेक कुरूवडे (रा. खांबित, ता. आस्ती, जि. वर्धा), कोमल हाबीवंत (रा. विटा, ता. खानापूर, जि. सांगली), श्रद्धा निंबाळकर (सातारा), शीतल कुलकर्णी (रा. हिंगणगड, ता. खानापूर, जि. सांगली), शहदमनी मोमीन (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.