शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

वर्षात २८ हजार मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सव्वा वर्षात २८ हजार ८६३ इतके मतदार वाढले आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सव्वा वर्षात २८ हजार ८६३ इतके मतदार वाढले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारी ३० लाख ९३ हजार ४३ इतकी होती. वर्षभरात ही संख्या ३१ लाख २१ हजार ९०६ इतकी झाली आहे. यात १६ लाख ५३८ पुरुष तर १५ लाख २१ हजार २९० महिला आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून ई ईपीक प्रणाली कार्यान्वित केली आहे. याअंतर्गत मतदार यादीत मतदारांच्या नावापुढे त्यांचा मोबाइल नंबर असल्यास त्यांना ई-मतदार ओळखपत्र मोबाइलवर डाऊनलोड करता येईल व ते मतदानासाठी ग्राह्य धरले जाईल.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लोकशाहीने दिलेला मतदानाचा हक्क बजावून नवभारत घडविण्यासाठी मतदारांनी मतदानास पुढे यावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी लोकसभा, विधानसभा, पदवीधरच्या निवडणुका असोत किंवा ग्रामपंचायत सर्वच निवडणुकांमध्ये मतदानात कोल्हापूर अग्रेसर असल्याचे गौरवोद्‌गार काढले.

यावेळी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार शीतल मुळे-भांबरे, शाहीर आझाद नायकवडी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी व नवमतदार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना शपथ दिली.

डॉ. बलकवडे यांनी लोकशाहीने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी प्रास्ताविक केले. दिव्यांग मतदार, नवमतदारांना मतदान ओळखपत्र मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या ब्रेल लिपी, निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. निवडणूक साक्षरतेमध्ये उल्‍लेखनीय काम केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

--