शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

अधिकारी-कर्मचाऱ्यांना बदल्यांचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:31 AM

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. ज्यांच्या सेवेला ३ वर्षे व ६ वर्षांचा कालावधी ...

कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. ज्यांच्या सेवेला ३ वर्षे व ६ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे, ते सध्या बदल्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची त्यांच्या पदानुसार व कार्यकालानुसार सदर तीन वर्षांनी बदली होत असते. दरवर्षी एप्रिल व मेमध्ये या सर्वसाधारण बदल्या होत असतात. मात्र, गेल्यावर्षी मार्चमध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने बदलीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली. बदलीसाठी ३१ जुलै २०२० पर्यंत दिलेली मुदत ऑगस्टपर्यंत वाढली. त्यानंतर आता नवीन वर्ष सुरू होऊन सहा महिने झाले तरी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत. शासनाने ३० जूनपर्यंत या बदल्या करण्याचे जाहीर केले होते; मात्र अजून त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता एकाच पद्धतीचे काम करून कर्मचारी कंटाळले आहेत. दुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेषत: महिलांनाही जेथे गैरसोयींची सामना लागत आहेत. त्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना आता बदलीचे वेध लागले आहेत.

--

प्रवास, सोयीचा विचार व्हावा

बदली करताना कार्यालयात जाण्यासाठी किती वेळ लागणार आहे, याचा विचार केला जावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दोन टोकाचे तालुके असले तरी प्रवास खर्च, येण्या-जाण्याचा वेळ, दुर्गम भाग असेल तर तिथे जाता-येतानाच्या अडचणी, कौटुंबिक स्थिती असे अनेक प्रश्न निर्माण होतात. हे सगळंच गैरसोयीचं ठरत असेल तर कार्यक्षमतादेखील कमी होते. त्यामुळे राहत असलेल्या तालुक्यापासून जवळच्या तालुक्यात बदली व्हावी, असे कर्मचाऱ्यांचे मत आहे.