जमीन हडपण्याच्या उद्देशाने स्मृतिभ्रंश झाल्याची खोटी नोटीस प्रसिद्ध करून मानहानी केल्याप्रकरणी मुलगा व वकिलावर कारवाई करावी, या मागणीसाठी शांताबाई बाबा जाधव (वय ७०, रा. रशिवडे) या वृद्ध महिलेने काल तहसील कार्यालयासमोर उपोषण केले.
शांताबाई जाधव यांच्या नावे राशिवडे येथे विविध ठिकाणी १४ गुंठे शेतजमीन आहे. त्यांचा मोठा मुलगा शामराव आबा जाधव व त्यांच्यात वाद आहे. यातून ही जमीन बळकावण्याच्या
उद्देशाने कोल्हापूर येथील वकील राहुल कोतेकर यांच्यामार्फत त्याने शांताबाई त्यांना स्मृतिभ्रंश असून, त्यांच्याशी याबाबत कोणीही व्यवहार
करू नये, अशी नोटीस एका वर्तमानपत्रात १९ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केली.
याविरोधात त्यांनी यापूर्वी विविध पातळ्यांवर निवेदने दिली आहेत. मात्र मला न्याय मिळाला नाही, उलट मलाच दमदाटी केली जाते, असा त्यांचा आरोप आहे. म्हणून याकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण केले.