शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

पाटपन्हाळ्यात स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खुला करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:17 AM

पाटपन्हाळा येथे कासारी नदीवर असणाऱ्या लहान पुलावर पावसाळ्यात पाणी येत असल्यामुळे दळवळणासाठी अडचणी येत होत्या. मागील वर्षी येथे पंतप्रधान ...

पाटपन्हाळा येथे कासारी नदीवर असणाऱ्या लहान पुलावर पावसाळ्यात पाणी येत असल्यामुळे दळवळणासाठी अडचणी येत होत्या. मागील वर्षी येथे पंतप्रधान सडक योजनेतून नवीन पूल झाला. मात्र या पुलाला भराव टाकण्यासाठी लागणाऱ्या जमिनीचे येथील तीन शेतकऱ्यांकडून भूसंपादन करण्यात आले होते. भराव टाकून पुलाच्या भरावाच्या बाजूने शिल्लक सार्वजनिक बांधकामाच्या जमिनीतून गावच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला होता.

पण या तीन शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच अतिक्रमण करून शेती करण्यास सुरुवात केली होती. यासाठी ग्रामपंचायतीने मोजणी आणून या जागेवर रस्त्यासाठी रेखांकन केले होते. पण या शेतकऱ्यांना याला दाद दिली नाही. यामुळे सरपंच संदीप पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली होती पण कारवाई झाली नव्हती. यामुळे सरपंचांनी प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली. यानंतर परिस्थितीची चौकशी करून प्रांताधिकारी बी. आर. माळी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अतिक्रमित जागा ताब्यात घेऊन स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खुला करण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट

पुलाला भराव टाकताना शिवलिंग तेली, उत्तम तेली, बाजीराव पाटील या शेतकऱ्यांची जागा संपादित केली आहे. पण जुन्या पुलासाठी संपादित केलेल्या जमिनीतून शिल्लक चार गुंठे जमिनीतून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बाजीराव पाटील या शेतकऱ्याने आपली जमीन गेली म्हणून अतिक्रमण केले आहे.