शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सेंद्रिय शेतीच देशाचे भविष्य

By admin | Published: January 31, 2015 12:19 AM

धनंजय महाडिक : भीमा कृषी प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन

कोल्हापूर : सेंद्रिय शेती उत्पन्नाची गरज पाहता त्याकडे शेतकऱ्यांनी वळावे. प्रगत देशांनी सेंद्रिय शेतीचे तंत्रज्ञान जोपासले आहे. सेंद्रिय शेतीच भारताचे भविष्य असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. आमदार महादेवराव महाडिक अध्यक्षस्थानी होते.खासदार महाडिक म्हणाले, कृषी प्रदर्शनामुळे एकाच छताखाली प्रगत तंत्रज्ञानाची माहिती घेण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. दुग्ध व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली तर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल. न्यूझीलंडमध्ये मुक्त गोठा पद्धतीमुळे एक कुटुंब पाचशे गायी सांभाळत आहे, येथील शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब करावा.आमदार महादेवराव महाडिक म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांनी आपल्या जीवनात क्रांती करावी, यासाठी खासदार महाडिक गेल्या दहा वर्षांपासून भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांनी सतत प्रयोगशील राहिले पाहिजे. शेती उत्पन्नावर आधारित उद्योगधंदे ग्रामीण भागात उभारले पाहिजेत, यासाठी उद्योजकांनी पुढे येणे गरजेचे आहे.‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांचे भाषण झाले. यावेळी विविध पुरस्कार व स्पर्धेतील बक्षीस वितरण झाले. यावेळी आमदार अमल महाडिक, ‘गोकुळ’चे संचालक विश्वास पाटील, रणजित पाटील, पी. डी. धुंदरे, सुरेश पाटील, भागीरथी महिला मंडळाच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, राजाराम कारखान्याचे अध्यक्ष दिलीप पाटील, सत्यजित भोसले, सत्यजित कदम, माणिक पाटील-चुयेकर, महापालिका महिला व बालकल्याण सभापती लीला धुमाळ, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) शासनाच्या मदतीशिवाय प्रदर्शनकृषी प्रदर्शन भरविणे एवढे सोपे नाही. अनेकजण प्रदर्शन भरवितात; पण शासनाच्या मदतीशिवाय हे प्रदर्शन सलग दहा वर्षे भरविले जात आहे. अशाप्रकारचे हे पहिलेच कृषी प्रदर्शन असून त्याला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असे गौरवोद्गार आमदार महादेवराव महाडिक यांनी काढले. पवारसाहेब मार्ग काढतील!कधी नव्हे इतका साखर उद्योग अडचणीत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येत आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते आहेत. ते मोदींना विनंती करून काही तरी मार्ग काढतील व कच्चा साखरेला ५०० ते ६०० रुपये अनुदान मिळवून देतील, अशी अपेक्षा आमदार महाडिक यांनी व्यक्त केली. पालकमंत्री अनुपस्थित!भीमा प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होते; पण अचानक मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक मुंबई येथे बोलावल्याने मंत्री पाटील यांना त्यासाठी जावे लागल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. जिजामाता शेतीभूषण पुरस्कार पद्मिनी माळी (मौजे सागांव), विमल दिंडे (बहिरेश्वर), अंजना पाटील (खानापूर), पद्मा सितापे (कोथळी), पद्मावती दिंडे (वडणगे).शेतीभूषण पुरस्कार दिलीप सबनीस (वालूर), बाजीराव पाटील (पार्ले), राहुल शिंदे (माले), सीताराम पाटील (बारवे), मारुती पाटील (नागांव).आदर्श शेतकरी पुरस्कार डॉ. वालचंद्र इंगळे (जयसिंगपूर), सुवर्णा पाटील (सागाव), आण्णासो मगदूम (वाठार), शीतल पाटील (चिंचवाड), बंडू चौगले (सांगवडेवाडी), तानाजी चौगले (म्हाळूंगे), तातोबा मेढे (गणेशवाडी), सुरेश पाटील (माले), तानाजी पाटील (हिरवडे-कोदवडे), राजगोेंडा पाटील (वसगडे).उत्कृष्ट संशोधक पुरस्कारडॉ. आनंदा चवई (तांत्रिक अधिकारी, राहुरी कृषी विद्यापीठ), प्रा. गजानन नेवकर (प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र), डॉ. संग्राम धुमाळ (कृषी महाविद्यालय).आदर्श तालुका कृषी अधिकारी दिलीपकुमार पाटील (टोप).आदर्श कृषी विस्तार अधिकारीप्रवीण शिंदे (शिवाजी पेठ), शंकर मुगडे (खाटांगळे), सुरेश सूर्यवंशी (कृषी महाविद्यालय), तानाजी पाटील (कळंबा), शीतल जाधव (दोनवडे).